
दक्षिण आफ्रिका खंडातील नामिबिया देशात इतका दुष्काळ पडला आहे की, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. नामिबियात गेल्या १०० वर्षांत असा दुष्काळ कधीच पडला नव्हता. या देशात लोकांकडील अन्नधान्य संपले असून उपासमारीची समस्या निर्माण झाली आहे. सरकारी धान्य गोदामेही रिकामी झाली आहे. त्यामुळे हत्ती, झेब्रा, हिप्पोपोटॅमस सह ७०० जनावरे मारण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. गेल्या महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघाने नामिबियाची निम्मी लोकसंख्या उपासमारीशी झुंजत असल्याचे म्हटले होते.