
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, त्यांची बायडेन यांच्याप्रमाणे मेमोरी लॉस झाली आहे. त्यांची स्मरणशक्ती हरवत चालली आहे. यावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया आली असून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींबद्दल केलेली टिप्पणी दुर्दैवी असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे.