
Manoj Jarange Patil News: बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी शनिवारी परभणी शहरात सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. नूतन महाविद्यालयाच्या मैदानापासून सुरू झालेल्या या मोर्चाचा समारोप शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ झाला. या मोर्चात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली. मी आतापर्यंत धनंजय मुंडे यांचे नाव घेतले नाही. पण देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर, धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, असाही त्यांनी इशारा दिला. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मागतोय तर, आम्ही जातीयवादी कसे? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.