
दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिलासा देत त्यांचा जामीन मंजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल १५६ दिवसांनंतर तिहार जेलच्या बाहेर आले आहेत. शुक्रवारी सांयकाळी केजरीवाल यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. बाहेर येताच ‘माझी ताकद १०० पटीने वाढली, अशी प्रतिक्रिया केजरीवाल यांनी दिली आहे.