
काय आहे भाजपच्या जाहीरनाम्यात ?
भाजपच्या संकल्पपत्रात विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. यात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी भावांतर योजना, वृद्ध पेन्शन योजनेत दीड हजार वरुन आता २१०० रुपये करणार, लाडकी बहीण योजनेची रक्कम २१०० करणार, प्रत्येक गरीबाला अन्ननिवाऱ्याचे नियोजन, २५ लाख रोजगार निर्मिती करणार, १० लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन देणार, एरोनॉटिक्स आणि स्पेसमध्ये उत्पादनाची संधी निर्माण करणार, शेतकऱ्यांसाठी मूल्यसाखळी तयार करणार, २०२७ पर्यंत ५० लाख लखपती दीदी तयार करणार, महारथी मार्फत मोठ्या लॅब तयार करण्याचा प्रयत्न करणार, महाराष्ट्रात कौशल्य जनगणना करणार, गरीब मध्यम वर्गीयांना सौर आणि अक्षय योजनेतून वीज बिलातून कमी करण्याचा प्रयत्न करणार, १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणार, युवकांसाठी स्वामी विवेकानंद फिटनेस कार्ड तयार करणार, गडकिल्ल्यांसाठी प्राधिकरण तयार करणार, ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा धोरण तयार करणार.