
Palghar News: पालकांच्या चिंतेत भर घालणारी माहिती समोर येत आहे. पालघर जिल्ह्यात लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली असून दोन मुलांची सुटका केली आहे. या टोळीत आणखी काही लोक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे पालघर नव्हेतर राज्यातील प्रत्येकाने आपल्या मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.