
Sugarcane Farmers News : राज्यात कमी झालेल्या पावसामुळे ऊस पिकावर परिणाम झाला आहे. यामुळे राज्यातील कारखानदारी संकटात सापडली आहे. राज्यातील कारखाने दोन ते अडीच महिनेच सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातच कर्नाटक सीमाभागातील कारखाने लवकर सुरू होतात जर राज्यातील ऊस तिकडे गेल्यास येथील कारखाने १०० दिवसही चालणार नाहीत, या भीतीने सरकारने परराज्यात ऊस घालण्यासाठी बंदी लादली होती. मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. यामुळे कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.







