
पोलिसांनी सांगितले की, गुरु वाघमारे यांनी मृत्यूपूर्वी तब्बल २२ लोकांची नावे गोंदवली होती. हे सर्व जण त्यांची हत्या करतील अशी त्यांना भीती होती. एका अधिकाऱ्याने सांगितले की, शवविच्छेदनादरम्यान वाघामरे यांनी मांडीवर गोंदवलेली नावे ही डॉक्टरांना दिसली. याची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली. यानंतर ज्या स्पामध्ये वाघमारे यांची हत्या झाली, त्या मालकालाही वरळी पोलिसांनी अटक केली आहे. असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथून मोहम्मद फिरोज अन्सारी (वय २६) आणि राजस्थानमधील कोटा येथून साकिब अन्सारी याला अन्य दोन संशयितांसह अटक केली आहे, असे त्यांनी सांगितले.