आजच्या काळात ताण कमी करण्यासाठी पतंजली योग हा एक प्रभावी मार्ग का मानला जातो?

0
2
आजच्या काळात ताण कमी करण्यासाठी पतंजली योग हा एक प्रभावी मार्ग का मानला जातो?


Patanjali Yoga : आजकालच्या धकाधकीच्या जीवनाचा परिणाम आपल्या शरीर, बुद्धी आणि सामाजिक नात्यांवर सुद्धा होऊ शकतो. लोक जगत असलेल्या जीवनातील तोटे समजून घेणे आणि त्यांना हाताळणे फार महत्वाचे आहे. जर तुम्हाला आरोग्यदायी जीवन जगायचे असेल तर योग्यवेळी खाणे, रोज थोडा व्यायाम करणे आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांशी चांगले नाते असणे गरजेचे असते आणि योग या सर्व गोष्टींना सोपं बनवतो. योग केल्याने फक्त शरीराला आणि मनाला फायदा मिळत नाही तर इतरांशी जुडण्यास आणि खुश राहण्यास सुद्धा मदत होते. 

पतंजली योग या सर्व गोष्टींची काळजी घेतो आणि मॉडर्न लाइफस्टाइलमध्ये लोकांचा ताण कमी करण्याची पद्धत समजावतो. परंतु सर्वात मोठा प्रश्न उद्भवतो की आजच्या काळात तणाव कमी करण्यासाठी पतंजली योग हा सर्वात प्रभावी मार्ग का मानला जातो? 

परंतू यापूर्वी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की आजकालच्या जीवनात कोण कोणत्या कारणांमुळे ताण येतो. 

खूप वेगवान आणि धावपळीचं जीवन 
प्रत्येक ठिकाणावरून खूप माहिती मिळणं ज्यामुळे डोकं खूप जड होतं. 
वर्क लाईफ आणि वैयक्तिक आयुष्यात संतुलन राहणे. 
सोशल मीडियावर नेहमी एक्टिव असणे आणि जास्तवेळ घालवणे 
पैशांमुळे येणारा ताण 
आरोग्यामुळे येणारा ताण  

पतंजली योग या सर्व समस्यांवर लक्ष ठेऊन आणि तणाव हाताळण्याचा पूर्णपणे संतुलित मार्ग देते. पतंजली योगाचे वेगवेगळे भाग तणाव कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. 

1. आसन (Physical Postures) – आसन आपल्या शरीराला लवचिकता आणि ताकद देते, ज्यामुळे शरीरावरचा ताण कमी होतो. जर पतंजली योगानुसार जर रोज आसन केलं तर स्नायू घट्ट होतात तसेच रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुद्धा चांगली होते. ज्यामुळे खूप आराम मिळतो. 

2. प्राणायाम  (Breathing Exercises) – प्राणायाममध्ये श्वास व्यवस्थित घेणं आणि सोडणं शिकवलं जातं. यामुळे डोकं शांत होतं आणि शरीरावरचा ताण  कमी होतो. मनात चाललेल्या विचारांचं द्वंद्व शांत करण्यात आणि भावनांना आवर घालण्यात मदत मिळते. 

3. ध्यान (Meditation) – ध्यानधारणा केल्याने मन शांत राहतं आणि असंख्य विचार करण्याऱ्या मनावर यामुळे आवर घालता येतो. आज धावपळीच्या जीवनात मन शांत ठेवणं खूप गरजेचं आहे. ध्यानधारणेमुळे हे शक्य होऊ शकतं. पतंजली ध्यान केल्याने हे साध्य होते आणि वैज्ञानिक संशोधनाने हे देखील सिद्ध केले आहे की यामुळे तणावाची पातळी कमी होते आणि विचार करण्याची शक्ती वाढते.

4. यम आणि नियम (Ethical Principles and Personal Disciplines) – यम आणि नियम हे आपल्याला चांगलं माणूस बनवण्याची शिकवण देते. जसे कोणत्याही व्यक्तीला नुकसान न पोहोचवणे, कोणाशीही भांडण न करणे, आपल्याकडे जे आहेत त्यात खुश राहणं. यामुळे नात्यांमध्ये शांतता आणि अनावश्यक चिंता देखील कमी होते. 

5. प्रत्याहार (Withdrawal of Senses) – प्रत्याहार म्हणजे तुमच्या इंद्रियांना आराम देणं, जसे काही वेळासाठी मोबाईल आणि टीव्ही पासून दूर राहणं. ज्यामुळे आंतरिक शांती मिळते. 

6. धारणा (Concentration) – धारणा म्हणजेच एका गोष्टीवर ध्यान लावणे. जेव्हा आपण एका कामावर फोकस करतो तेव्हा ते काम लवकर आणि चांगले होते. ज्यामुळे तणाव वाढत नाही. एकाग्रतेमुळे लक्ष विचलित होतं नाही आणि आपण स्वतःला नियंत्रित करू शकतो. 

पतंजली योग हा ताणतणाव नियंत्रित करण्याचा एक चांगला उपाय आहे. कारण हा उपाय अतिशय अभ्यासपूर्वक बनवण्यात आला असून काळानुसार तो अतिशय उपयोगाचा आहे. सध्याच्या मॉर्डेन सायन्सनुसार योगाचे वेगवेगळे भाग आहेत जसं की प्राणायाम, ध्यान, आसन इत्यादी जे आजच्या तणावासाठी उत्तम उपचार आहेत. या कारणास्तव, पतंजली योग आता केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात दत्तक घेत आहेत.

(Disclaimer – This article is part of India Dotcom Pvt Lt’s consumer connect initiative, a paid publication program IDPL claims no editorial involvement and assumes no responsibility or liability for any errors or omissions in the content of the article.)

 





Source link