
Ganesh Visarjan Government Warning: आज दीड दिवसांच्या गणरायाला भाविक निरोप देणार आहेत. मुंबईत समुद्रात प्रामुख्याने गणरायाचे विसर्जन केले जाते. मात्र, समुद्रात उतरतांना गणेश भक्तांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. समुद्रात धोकादायक मासे चावे घेण्याची शक्यता आहे. यामुळे गंभीर इजा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या वर्षी तब्बल ६७ गणेशभक्तांना मासे चावले होते. त्यामुळे या वर्षी देखील गणेश विसर्जनादरम्यान नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.