आसूः पंतप्रधान झालो तरीही माझ्यासोबत कार्यकर्ता नसेल तर त्या पंतप्रधानपदाचा काही उपयोग नाही. तालुक्याचं भलं करावं म्हणून आम्ही राजकारणात आलो होतो. तालुक्याच्या कोणत्या अडचणीत शिवरूपराजे उभे राहिले आहेत, ते त्यांनी सांगावे. आम्ही पूर्वभागाची माफी मागितली पाहिजे, कारण ह्या अशा माणसाच्या मागे आम्ही तुम्हा जनतेला उभे राहायला सांगितले होते. शिवरूपराजे यांना आम्ही घर म्हणून सर्व दिलं; मात्र, त्यांनी आम्हास परकं मानलं आहे; शिवरूपराजे सुरुवात तुम्ही केली आहे शेवट आम्ही करू असे परखड मत विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी मांडले आहे.
महाराष्ट्रासह फलटणच्या राजकारणात आमचा विरोध हा देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादा पवार यांना नव्हता आमचा विरोध हा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना होता.मी स्वतः देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवारांना बैठकीत सांगितले होते. प्रशासनाला वेठीस धरून आमच्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस मध्ये अडकवणे अशा प्रकारची टोळीच जिल्ह्यात तयार झाली होती.त्याच्यातले हे एक होते म्हणून आमचा त्यांच्या उमेदवारीला विरोध होता.एक वेळ माजी खासदार रणजितसिंह ना.निंबाळकर यांच्याशी तडजोड करेल कारण ते घर इथले आहे परंतु शिवरूपराजे खर्डेकरांन बरोबर तडजोड करणार नाही. राजकारण संपले तरी चालेल इथून पुढे राजकीय संबंध तुमचे आमचे संपले.मला काहीही भोगायला लागले तरी चालेल असे परखड मत श्रीमंत.रामराजे ना.निंबाळकर यांनी शिवरूपराजे यांच्या विषय बोलताना मांडले आसू (ता. फलटण) येथील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.यावेळी आयोजित जाहीर सभेत श्रीमंत.रामराजे बोलत होते.यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, श्रीराम कारखान्याचे संचालक स्वामीनाथ साबळे, राजन फराटे, अशोक तावरे यांच्यासह आसू पंचक्रोशीतील राजे गटाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.आसू गावातील शाळेचे ग्राउंडवर पेव्हर ब्लॉक बसविणे, बाजार समितीचा उपबाजार व जनावरे बाजार भरविणे, बौद्ध वस्तीमध्ये बौद्ध विहार बांधणे अशा विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.तसेच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
श्रीमंत रामराजे यावेळी बोलताना म्हणाले की मी जर लोकसभेला माजी खासदारांबरोबर राहिलो असतो तर लोकसभा निवडणुकीनंतर सभापतीपद मला मिळाले असते परंतु मी सभापती पद नाकारले सभापती पद घेऊन काय करू माझा कार्यकर्ता माझ्याजवळ राहिला नसता.शिवरूपराजे यांना फलटण तालुक्यातील पदे देताना काय अजितदादांना विचारून दिली होती काय आम्ही तुमच्या घराकडे बघून पदे दिली होती.महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जायचे आणि फलटण मध्ये आम्हाला तिकीट मिळणार आहे असे म्हणून माजी खासदार फलटणमध्ये फिरत आहेत अजित दादांना आम्ही विचारू नाहीतर आमची भूमिका सांगून नाहीतर आम्हाला काय करायचे ते करू आमची राजकीय सुरुवात या तालुक्याचे भले करण्यासाठी होती.फलटण तालुक्यातील अडचणीत असलेल्या कुठल्या संस्थेबाबत शिवरूपराजे पुढे आले होते. संजीवराजे खरं तर आपण आसू भागातील शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे कारण जो माणूस आपण त्यांच्यावर लादला त्याच माणसाने त्यांची घरेदारे बघितली नाहीत.
श्रीमंत रामराजे श्रीमंत संजीवराजे यांनी फलटण तालुक्याचा विकास साधला: आमदार दीपक चव्हाण…..
आमदार दीपक चव्हाण म्हणाले की, रामराजे यांच्या नेतृत्वात फलटण तालुक्याचा चौफेर विकास झाला आहे. दुष्काळी भागाला पाणी द्यायचे काम रामराजे यांनी केले आहे. यासोबतच बागायती पट्ट्यामध्ये मूलभूत सुविधा देण्याचे काम रामराजे यांनी केले आहे. रामराजे यांच्या माध्यमातून ‘कमिन्स’सारखी मोठी कंपनी झाली आहे. नीरा-देवघर प्रकल्प हा रामराजे यांच्या काळातच झाला आहे. पाडेगाव ते आसूपर्यंतच्या ३६ गावांना पाणी देण्याचे काम रामराजे व संजीवराजे यांनी केले आहे. तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढविण्याचे काम रामराजे यांनी केले आहे. वेळोवेळी तालुक्याचा सर्वांगीण विकसं करण्याचे काम रामराजे यांच्या काळातच झाले आहे.
नेता व गट अडचणीत असताना ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला साथ दिली त्या कार्यकर्त्यांच्या मागे ठामपणे उभे राहणार:श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर….
श्रीमंत संजीवराजे म्हणाले की आज आसू येथील जाहीर सभा ही वेगळी आहे. लोकसभेला राज्यात महायुतीचे एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस,अजित पवार,एकत्र होते.परंतु फलटण तालुक्यात माजी खासदार हीच अडचण होती हे लपवून ठेवता येणार नाही हे कार्यकर्त्यांना ही माहित आहे.आपला नेता व गट अडचणीत असताना शिवरूपराजे यांनी घेतलेली भूमिका योग्य नव्हती आपला नेता व गट अडचणीत असताना ज्या कार्यकर्त्यांनी नेत्याला व गटाला साथ दिली त्या कार्यकर्त्यांबरोबर आम्ही ठामपणे इथून पुढे उभे राहणार आहोत.गटामध्ये असताना समान संधी देण्याचा प्रयत्न केला वेगळं कधीच मानले नाही परंतु राजे गट अडचणीत असताना शिवरूपराजे यांनी अडचणी दूर करण्या पेक्षा अडचणी निर्माण करण्याचे काम केले. इथून पुढे आसू भागातील कार्यकर्त्यांनी मनमोकळेपनाने काम करावे आम्ही तुम्हाला काही कमी पडून देणार नाही ही कळ्या दगडावरची रेघ आहे.येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये तुम्हा कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निवडणुका लढवल्या जातील.