
सर्जिकल स्ट्राईकमध्ये भारताने किती आतंकवादी मारले, असा प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही म्हणणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले होते. या हल्ल्यांचे राजकीय भांडवल करणे त्यांना अजिबात आवडले नव्हते. विक्रम गोखले यांनी ‘वजीर’ या मराठी चित्रपटात काम केले होते, मात्र हा चित्रपट टुकार असल्याचे ते स्वतःच म्हणाले होते. काशिनाथ घाणेकर यांचा अभिनय ‘अभिनय’ नव्हता हे सांगण्याचे धाडसही त्यांनी केलं होतं. तर, मराठी मालिका या अतिशय रटाळवाण्या असतात, त्या बघूच नका, असं आवाहन प्रेक्षकांना केलं होतं. अशा अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते नेहमीची चर्चेत राहिले होते.







