
साबळे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे. या आंदोलनाला गालबोट लावण्याचा आमचा प्रयत्न नाही. पण मराठा समाजा माजोरडा आहे, मराठा समाजाला मी आरक्षण मिळूच देणार नाही,मराठा समाजाची सभा ही जत्रा आहे असं, सातत्याने बोलून आमच्या भावना दुखावण्याचं काम गुणरत्न सदावर्तेकरत आहेत. यालाचाप लावण्याचं काम आम्ही केलंय. आमच्याकडून कायदा मोडला गेला असेल तरी लाखो करोडो मराठ्यांच्या अस्मितेचा हा प्रश्न आहे. लाखो-करोडो मराठांच्या मानसन्मानाचा हा प्रश्न आहे असं मंगेश साबळे यांनी म्हटलंय.





