
उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
उत्तर प्रदेशमधून मोठी बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेशच्या कासगंज जिल्ह्यात शनिवारी सकाळी शनिवारी एक भीषण अपघात झाला आहे. भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात पडली (Uttar Pradesh Accident) या अपघातात सात मुल आणि महिलांसह 20 जणांंचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं संपुर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
हे सुद्धा वाचा
कसा झाला अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कासगंजमधील काही भाविक गंगास्नान करण्यासाठी निघाले होते. ट्रॅालीमध्ये 15 ते 20 लोकं बसली होती. दरम्यान, पटियाली दरियावगंज रस्त्यावर ट्रॅाली येताच ती अनियंत्रित होऊन तलावात पडली. यावेळी ट्रॉलीमध्ये प्रवास करणाऱ्या सात मुले आणि आठ महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ आणि आरडाओरडा झाला.