
आता सोशल मीडियावर बोलायचे झाले तर काही लोकांनी महिलेच्या या कृतीचं समर्थन केले, तर अनेकांचे म्हणणे आहे की, होणाऱ्या नवऱ्यासोबत नातं तोडणं हा चुकीचा निर्णय आहे. मतदान हा कोणाचाही वैयक्तिक निर्णय असतो, असे या लोकांचे म्हणणे आहे. तो मतदान करतो की नाही, किंवा कोणाला मत देतो. त्या आधारे नातं टिकवण्याचा किंवा तोडण्याचा निर्णय घेऊ नये. एका युजरने लिहिले की, ‘तुम्ही तरुणीच्या या निर्णयामुळे तिच्या बद्दल मत बनवू शकत नाही. आपण कुण्याच्या वागण्यावर आणि आवडीवर नियंत्रण ठेवू शकत नाही. हा त्यांचा स्वतःचा निर्णय आहे. एखाद्याला मतदान करताना आपल्यासोबत राहण्याचा अधिकार असावा असे तुम्हाला वाटत असेल, तर ते जे ठरवतील ते ठरवतात. नातं तोडण्यासाठी तुम्ही कोणतेही निमित्त ठरवू शकता, असे एका युझरने लिहिलं आहे.