
काय म्हणाला अश्नीर ग्रोव्हर?
ट्विटरवर आपली प्रतिक्रिया पोस्ट करताना त्यांनी लिहिले की, ‘कंटाळवाणा, निर्जीव आणि अर्थहीन. हा अर्थसंकल्प मांडण्याऐवजी त्या सहज म्हणू शकल्या असत्या की, मला यावेळेस काय करावेसे वाटत नाहीये, काय करायचं असेल तर पुढच्या वेळी बघू…’ या पोस्टमध्ये त्यांनी पुढे लिहिलं की, ‘या अर्थसंकल्पाऐवजी अंबानींचा आणखी एखादा विवाह सोहळा पाहिला असता तर बरं झालं असतं. त्यामुळे माझ्या मौल्यवान वेळेचा अधिक चांगला उपयोग झाला असता’. अश्नीर ग्रोव्हर यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२४वर टीका करण्याची संधी सोडलेली नाही.