
शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अदानी उद्योग समुहाच्या वतीने करण्यात येणाऱ्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात आज महामार्चाचे आयोजन करण्यात आले होते. या महामोर्चामध्ये शिवसैनिकांसह महाविकास आघाडी आणि इतर पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चा संपल्यानंतर आयोजित सभेमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी अदानी तसेच राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ज्यांनी ज्यांनी अदानींची सुपारी घेतली आहे त्यांनी आजच्या मोर्चातील हा अडकित्ता, खलबत्ता लक्षात घ्यावा. या खलबत्त्यात यांना असं चेचून काढू की, पुन्हा अदानींचं नाव काढणार नाहीत, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.



