
अश्विनी वाघमारे ‘मिसेस इंडिया’ ही स्पर्धा जिंकून सगळ्यांसाठीच प्रेरणा ठरली आहे. या स्पर्धेनंतर तिच्याकडे अनेक नव्या संधी चालून येत आहेत. मात्र, अश्विनी या स्पर्धेनंतर आपल्या संसारात आणि रोजच्या जीवनात मग्न झाली आहे. आपला संसार सुरळीत चालवा म्हणून अश्विनीने एक छोटसं ब्युटी पार्लर सुरू केलं होतं. याच ब्युटी पार्लरचा व्यवसाय वाढवा म्हणून आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी तिने ‘मिसेस इंडिया’ या स्पर्धेत भाग घेतला होता. हे सगळं करत असताना देखील ती नेहमीच सामान्य गृहिणी म्हणून वावरली.








