
बरेच दिवस घरापासून लांब असलेले श्रेयस आणि शिल्पीचे बाबा आता घरी परतून आले आहेत. मित्राच्या मृत्यूमुळे ते अचानक खचून गेले आहेत. यावेळी त्यांनी मित्राचं उदाहरण गाठीशी बांधून स्वतःचं मृत्यूपत्र बनवण्याचा निर्णय घेतला आहे. आपली संपत्ती अर्थात राहतं घर त्यांनी दोन्ही मुलांमध्ये समान वाटणी करून देण्याचं ठरवलं आहे. मात्र, यात त्यांच्या पत्नीने विरोध दर्शवला आहे. घर दोन्ही मुलांमध्ये वाटणी करण्याऐवजी एकट्या शिल्पीला ते देण्यात यावं असं तिने म्हटलं. यावर जरी बाबांनी आक्षेप घेतला असला, तरी आईने आपला हट्ट लावून धरला आहे.