
‘आसिफा’ हे स्वार्थी आणि धूर्त पात्र आहे. सोनिया बालानीने सांगितले की, ‘द केरळ स्टोरी’ रिलीज झाल्यानंतर तिच्यावर एक-दोन नव्हे, तर खूप द्वेषयुक्त कमेंट्स आल्या. सोशल मीडियावर तिला धमक्या देण्यात आल्या, त्यामुळे ती खूप घाबरली होती. सोनिया म्हणाली की, हा चित्रपट पाहिल्यानंतर लोक खूप संवेदनशील झाले आहेत. धमक्या मिळाल्यानंतर तिने घराबाहेर पडणे देखील बंद केले होते. मात्र, काहीही झाले तरी यात तिच्या कुटुंबाने तिची साथ सोडली नाही.








