
‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरून देशभरात वाद सुरू असताना आता अभिनेते योगेश सोमण यांनी मात्र ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची कथा समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर, रामदास स्वामी यांनी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाची कथा शेकडो वर्षांपूर्वी एका ओळीत लिहून ठेवली आहे, असं योगेश सोमण म्हणाले आहेत. त्यांनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाविषयी भाष्य केलं आहे.








