
या वादात आता प्रियामध्ये पडून सगळा आरोप सायलीवर ढकलण्याचा प्रयत्न करणार आहे. सायलीमुळेच चैतन्य आणि अर्जुन यांच्यात वाद झाले आणि दुरावा आला, असे प्रिया म्हणणार आहे. ‘तुला मधुभाऊंना सोडवायचं आहे, तुझा स्वार्थ आहे आणि म्हणूनच तू साक्षीवर खुनाचा आळ घेतला. तू मुद्दाम असं बोलतेस आणि सगळ्यांमध्ये आग लावतेस’, असे प्रिया म्हणणार आहे. आता पूर्णा आजी देखील सायलीवर आरोपांच्या फैरी झाडणार आहे. मात्र, सायलीवर आरोप सुरू असताना अर्जुन खंबीरपणे साथ देणार आहे.








