
अर्जुनवर रागावलेली सायली गेल्या काही दिवसांपासून सासर सोडून माहेरी अर्थात कुसुम ताईंच्या घरी येऊन राहत होती. तर, अर्जुन देखील तिची समजूत काढण्यासाठी कुसुम ताईंच्या घराबाहेरच ठाण मांडून होता. सायलीने आपल्याला माफ करावं म्हणून अर्जुनने अनेक प्रयत्न केले होते. आता हळूहळू सायलीचा राग विरघळून देखील गेला होता. मात्र, तिने धरलेला अबोला अजूनही सुटत नव्हता. सायलीच्या न बोलण्यामुळे अर्जुन अस्वस्थ झाला होता. मात्र, सायलीचा हा अबोला काही केल्या जात नव्हता. आता सायलीसोबत एक अशी घटना घडणार आहे, ज्यामुळे तिला मोठा धक्का बसणार आहे. तर, अर्जुन ऐनवेळी येऊन सायलीचा जीव वाचवणार आहे.







