
घरातल्यांनी आपला सून म्हणून स्वीकार केला असला, तरीही आपण या घरची घरी सून नाही ही गोष्ट सायलीच्या मनाला सतत टोचत आहे. आपण असं वागून पूर्णा आजींचा आणि घरातील सगळ्यांचाच विश्वासघात करतोय, असं सायलीच्या मनात येतं. या गोष्टीमुळे सायलीला झालेला सगळाच आनंद निघून जातो. एकीकडे सायली खूप खुश आहे. मात्र, दुसरीकडे हा आनंद आपला नाही हे लक्षात आल्यावर तिच्या मनाला फारच वाईट वाटत आहे. सायलीला दुःखी झालेलं पाहून अर्जुन देखील गोंधळात पडला होता. सायलीला आता आनंद झाला होता, मग आता असं काय झालं की ज्यामुळे ती रडू लागली, असा प्रश्न अर्जुनला पडला.







