
मात्र, त्यांची मृत शरीरं अपघाताच्या ठिकाणी न सापडल्यामुळे आजही त्यांनी आपल्या पत्नी आणि मुलीचा शोध सुरू ठेवला होता. गडगंज संपत्ती असलेल्या रविराजला अडकवून, त्याची संपत्ती हिसकावून घ्यायची असा प्लान त्याचा भाऊ नागराज याने केला होता. या प्लाननुसार नागराज याने एका आश्रमातील मुलीला तन्वी बनवून आपल्या घरी आणलं आहे. तर, दुसरीकडे त्याने एका बेवारस महिलेचा मृतदेह आणून तो प्रतिमाचा असल्याचे सगळ्यांना सांगितले आहे. त्यामुळे आता रविराजने देखील आपली पत्नी देवाघरी गेल्याचं मान्य केलं होतं. मात्र, तो या धक्क्यातून सावरत असतानाच त्याच्यासमोर प्रतिमा आल्याने आता त्याला खूप आनंद झाला आहे.








