
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
अमली पदार्थांमुळे तरुणांचे खूप नुकसान होत आहे. यामुळे अंमली पदार्थांची विक्री थांबवण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. जेसीबी, बुलडोझर लावून बेकायदा बांधकामे मुळासकट तोडून टाका. अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच, या कारवाईदरम्यान कोणी कोणाला पाठीशी घालत असेल तर, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असाही इशारा देण्यात आला. ड्रग्ज प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले असून ते सरकारवर सातत्याने टीका करत आहेत याप्रकरणातील दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, विरोधकांनी उगाच यावर राजकारण करू नये, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.






