
वांगचुक म्हणाले, ‘भारत ही लोकशाहीची जननी आहे आणि आपल्या नागरिकांमध्ये एक विशेष शक्ती आहे. आम्ही निर्णायक भूमिकेत आहोत, आम्ही कोणत्याही सरकारला त्याचे मार्ग बदलण्यास भाग पाडू शकतो. सरकार काम करत नसल्यास सरकार बदलू देखील शकतो. यावेळी राष्ट्रीय हितासाठी तुमचा मताधिकार अतिशय काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. लोकसभा निवडणुकीसाठी लडाखमध्ये २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.








