
दरम्यान, पोलिस विशालचा शोध घेत होते. मात्र, तो सापडला नव्हता. दरम्यान, जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर रात्री ११ वाजता पोलिसांना शहरातील तुळजापूर नाका येथे एक मुलगा बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याला दवाखान्यात नेले असता, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, बट्टू यांचा मुलगा बेपत्ता असल्याने पोलिसांनी हा मुलगा तोच आहे का म्हणून बट्टू यांना ओळख पटवण्यासाठी बोलावले. दरम्यान, नतेवाईकांनी मृतदेह पाहिला असता तो विशालचाच असल्याचे सांगितले. यामुळे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालात सोडियम नायट्रेट्चे सेवन केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना समजले.







