
खोतांनी उमाला केवळ एका अटीवर संध्याला भेटण्याची परवानगी दिली होती. उमाने संध्याकडून परत येताना तिची आठवण देखील पुन्हा घरी घेऊन यायची नाही, अशी ही अट होती. मात्र, उमा येताना तिची भाची ओवी हिला सोबत घेऊन आली होती. संध्याचा मृत्यू झाल्याने तिचं कार्य उरकेपर्यंतच ओवी या घरात राहील, असा सगळ्यांचा समज झाला होता. मात्र, आता उमाला सगळं सत्य सांगावं लागणार आहे. आईविना पोरकी झालेली ओवी आता कायम खोतांच्या घरात राहणार, हे देखील आता ती सगळ्यांना सांगणार आहे.







