
पुढे त्यांनी मराठी रंगमंच हा अतिशय दमदार आहे असे म्हटले. “तुम्ही हा पुरस्कार सुरु केला याचा मला अतिशय आनंद आहे. मराठी रंगमंच हा अतिशय दमदार आहे. देशामध्ये कलात्मकता ज्यांनी जपली ते आपण मराठी लोक आहोत. कदाचित आमचे बजेट मोठे नसेल. पण मी हे दाव्याने सांगतो जी कलात्मकता मराठी सिनेमा, मालिकांमध्ये आहे ती कुठेच बघायला मिळत नाही. मराठी कलावंतांनी नाटक जिवंत ठेवले आहे. नाटक जिवंत ठेवण्याचे सर्वात जास्त काम मराठी कलावंतांनी केले आहे. त्यामुळे अशाप्रकारे पुरस्कार अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण जे चांगले आहे त्याचे कौतुक करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. ते आज या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून केले आहे” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.







