
दीपिका, कार्तिकी, दीपा आणि सौंदर्या इनामदार चौघी मिळून कार्तिकला आणण्यासाठी तुरुंगात जाणार आहेत. मात्र, तिथे गेल्यावर त्यांना एक मोठा धक्का बसणार आहे. कार्तिक इनामदार कुणाचीही वाट न बघता निघून गेल्याचं त्यांना कळणार आहे. तर, कार्तिक घरी देखील परतलेला नाही, हे पाहून सगळ्यांनाच त्याची काळजी वाटणार आहे. तर, कार्तिकी यावेळी देखील दीपावर याच खापर फोडणार आहे. दीपामुळेच कार्तिक घरी आलेला नाही, हिने पुन्हा काहीतरी केलं असेल, अस कार्तिकी दीपाला म्हणणार आहे.