
कार्तिकशी आपलं लग्न व्हावं, म्हणून आयेशाने अनेक प्रयत्न केले. कधी तिने दीपाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तर कधी कार्तिक आणि दीपामध्ये मोठा गैरसमज निर्माण केला. मात्र, दीपा नेहमीच सगळ्या संकटांना अतिशय धैर्याने सामोरी गेली होती. दीपाने नेहमीच आपला संसार वाचवा म्हणून अनेक प्रयत्न केले. मात्र, यावेळेस आयेशाने तिच्या मुलींच्या आयुष्याचा खेळ करून, त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आता दीपामधली आई चांगलीच पेटून उठली आहे. ती आता आयेशाला तिच्या सगळ्या कृत्यांची शिक्षा घडवणार आहे. यासाठी ते आता घटस्फोटाचं नाटक रचणार आहेत.






