
भाजपला निकाल लागून सहा दिवस झाले, तरी अजूनही राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील मुख्यमंत्री ठरवता आलेला नाही. परंतु, तीन राज्यांच्या अभूतपूर्व यशानंतर भाजपचे हायकमांड चांगलेच अॅक्टीव्ह झाले आहे. यामुळे आता या राज्यांचे मुख्यमंत्र्यांची नेमणूक करण्याकरिता दिल्लीतून निरीक्षक जाणार आहेत.
नवी दिल्ली : भाजपला तीन राज्यांत घवघवीत यश मिळाल्यानंतर आता केंद्रातील भाजप चांगलेच अॅक्टीव्ह झाले आहे. काँग्रेसच्या हायकमांड राजकारणावर भाजपकडून सातत्याने टीका करण्यात येते. मात्र, आता तोच कित्ता भाजपने गिरवत हायकमांड राजकारण जोरात सुरू केले आहे. भाजपला निकाल लागून सहा दिवस झाले, तरी अजूनही राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील मुख्यमंत्री ठरवता आलेला नाही.
राजस्थान भाजप प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी म्हणाले









