
राज ठाकरे म्हणाले की, शारदाश्रम महाविद्यालयाचे पालक माझ्याकडे आले होते. त्याच्या शाळेला एक नोटीस आली असून पहिली ते चौथीच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी बोलवून घेण्यात आलं आहे. शिक्षकांना शाळाबाह्य कामे लावल्यानंतर मुलांना शिकवण्याची व्यवस्था नाही. मुंबईत ४१३६ शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी बाहेर काढण्यात आलं आहे. निवडणूक आयोग पाच वर्ष काय करत असतं? असल्या प्रकारची कोणतीही लोक ते तयार का करत नाही. आयत्यावेळी शाळांवर दडपण का आणतात?, असा सवाल राज ठाकरेंनी केला.






