
‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेत आकाश आणि वसूची कथा दाखवण्यात आली आहे. पहिल्या दिवसापासूनचा ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. आता या मालिकेत एक वेगळे वळण आले आहे. मालिकेत आकाश आणि वसुच्या लग्नानंतर अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. आकाश वसूला काही तरी खास सरप्राईज देणार आहे. आता हे सरप्राईज काय असणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.