
येरवडा येथे आंतर्धमीय विवाहवरून झालेला खून यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर अमितेश कुमार यांनी येथे नागरी संवादाचे आयोजन केले होते. गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक गैरप्रकार उघडकीस आली आहे. कोयता गँग, हामाणारी, गाड्यांची तोडफोड आदी माध्यमातून गुन्हेगार दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. शांतता अबाधित राहण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे. पुणे पोलिसांचा संयम तुटला तर कडक कारवाई करण्यात येईल, असे देखील अमितेश कुमार म्हणाले.