Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रप्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त...

प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे

लोकसभा निवडणुकीच्या महाविकास आघाडातील जागा वाटपाचा प्रश्न अजून सुटलेला नाही . महाविकास आघाडीतील नेत्यांसह वंचित बहुजन आघाडीचे नेत प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा देखील झाल्या . मात्र त्यातून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही जागा वाटपाबाबत कोणताही निर्णय होऊ शकत नाही . जागा वाटपाबाबत कोणताही निर्णय होऊ शकत नसल्याने प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे . सध्या त्यांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे .प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात काय लिहिले आहे? . प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात म्हटलंय की आगामी लोकसभा निवडणूक या किंवा पुढच्या आठवड्यात जाहीर होऊ शकतात महाविकास आघाडीने आपापसात जागावाटपाचे समीकरण निश्चित केलेले नाही . मी आघाडीबाबत सकारात्मक आहे परंतु जागावाटपावरून होणारी दिरंगाई चिंतेचा विषय आहे . महाविकास आघाडीत काँग्रेस शिवसेना यांच्यात किमान १० जागा आणि काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीत ५ जागांवर समन्वयाचा अभाव आहे . त्यामुळे जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी वेळ लागतो , असे त्यांनी त्यातून स्पष्ट केले . . निवडणूकीसाठी कमी कालावधी काँग्रेस शिवसेना यांच्यातील असमन्वय आणि महाविकास आघाडीत जागावाटप फॉर्म्युला अंतिम न होणे हे लक्षात घेता मी ९ मार्च रोजी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी संपर्क साधला . त्यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली . तेव्हा शिवसेना कमीत कमी १८ जागा ज्या भाजपा सोबत एकत्रित असताना त्यांनी जिंकल्या होत्या . त्या मागत असल्याबद्दल त्यांनी चिंत व्यक्त केली . चैन्नीथला यांची चिंता समजून मी वचिंत बहुजन आणि काँग्रेसने एकत्रित बसून ज्या जागा काँग्रेसच्या मनात आणि महाविकास आघाडीत मागणी केल्या त्या सर्व जागावर चर्चा करावी . असा प्रस्ताव दिला . तेव्हा बाळासाहेब थोरात माझ्याशी संपर्क साधून प्रस्तावावर पुढे चर्चा करतील असे आश्वासन मला देण्यात आले बाळासाहेब थोरात लवकरच चर्चेसाठी तारीख व आणि वेळ ठरवतील . जेणेकरून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी मिळून भाजपा आर एस एस ला उद्ध्वस्त करण्यासाठी पुढे जाता येईल असंही प्रकाश आंबेडकरांनी पत्रात लिहिले आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments