Saturday, July 25, 2026
Home Blog Page 414

पुण्यातून ‘उत्तर भारत देवभूमि यात्रा’ विशेष रेल्वे

0
पुण्यातून ‘उत्तर भारत देवभूमि यात्रा’ विशेष रेल्वे


पुणे : ‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’कडून (आयआरसीटीसी) सुरू करण्यात आलेल्या पर्यटन रेल्वे सेवेंतर्गत ‘उत्तर भारत देवभूमि यात्रा गुरुकृपासह’ या विशेष रेल्वेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या गुरुवारी (१७ एप्रिल) पुण्यातून ही विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे.ही यात्रा सुमारे पाच हजार किलोमीटर अंतराची असून, हरिद्वार, हृषीकेश, अमृतसर, वैष्णोदेवी (कटरा), मथुरा, वृंदावन आणि आग्रा यांसारख्या महत्त्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देऊन दहा दिवसांनी ती पुन्हा पुण्यात येणार आहे.

‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वानुसार आरक्षण करण्यात येणार असून, ७५० आसनक्षमता निश्चित करण्यात आली आहे. इच्छुकांना पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण, वसई रस्ता, वापी, सूरत, बडोदा या रेल्वे स्थानकांवरून रेल्वेत बसता येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, केंद्र शासनाच्या ‘देखो अपना देश’ या योजनेंतर्गत ‘भारतगौरव’ ही विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेद्वारे देशभरातून आतापर्यंत ८६ गाड्या सोडण्यात आल्या आहेत. जानेवारी महिन्यात उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील महाकुंभनिमित्त ‘भारत गौरव’ची विशेष रेल्वे सोडण्यात आली होती. या रेल्वेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच धर्तीवर ‘उत्तर भारत देवभूमि यात्रा गुरुकृपासह’ या विशेष यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा

या स्थळांना भेट

हरिद्वार : हृषीकेश, हर की पौडी, गंगा आरती

अमृतसर : सुवर्ण मंदिर, वाघा बॉर्डर

कटरा : माता वैष्णोदेवी दर्शन

मथुरा : वृंदावन, श्रीकृष्ण जन्मभूमी आणि प्रमुख मंदिरे

आग्रा : ताजमहाल

प्रतिप्रवासी शुल्क

सामान्य श्रेणी (शयनयान) : रु. १८ हजार २३०

तृतीय श्रेणी (थ्री टीअर) : रु. ३३ हजार ८८०

द्वितीय श्रेणी (टू टीअर) : रु. ४१ हजार ५३०

प्रवाशांसाठी सुविधा

वातानुकूलित सुविधा आणि राहण्याची व्यवस्था

शाकाहारी भोजन (चहा, नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण)

पर्यटनस्थळी उतरल्यानंतरही वातानुकूलित वाहनाची व्यवस्था

विविध धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांची माहिती देण्यासाठी मार्गदर्शक (गाइड)





Source link

OYO रुममध्ये रोमान्स करताना दरवाजा बंद करायचं विसरले, मेट्रो स्थानकावरुन सगळे पाहत होते LIVE अन्…; VIDEO व्हायरल

0
OYO रुममध्ये रोमान्स करताना दरवाजा बंद करायचं विसरले, मेट्रो स्थानकावरुन सगळे पाहत होते LIVE अन्…; VIDEO व्हायरल


Viral Video: कधी कधी उत्साहाच्या भरात आपण केलेली चूक आयुष्यभरासाठी धडा शिकवणारी ठरते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक जोडपं विश्रांती आणि प्रेमाच्या काही क्षणांसाठी हॉटेलमध्य गेलं होतं. पण हॉटेलमध्ये गेल्यानंतर प्रायव्हसी विसरले आणि दरवाजा तसाच उघडा ठेवला. त्यामुळे झालं असं की, त्यांचे खासगीतील क्षण जवळच असणाऱ्या मेट्रो स्थानकाच्या फूटओव्हर ब्रीजवरुन लोक लाईव्ह पाहू लागले. 

व्हायरल व्हिडीओत दिसत आहे की, OYO हॉटेलमधील एका रुमचा बाल्कनीमधील दरवाजा उघडा होता. आतमध्ये एक प्रेमी जोडपं आपल्या खासगी क्षणांमध्ये गुंतलं होतं. या हॉटेलच्या अगदी समोर मेट्रो स्टेशन आहे. या मेट्रो स्थानकावरुन हॉटेलमधील सगळं काही स्पष्ट दिसत होते. अखेरीस एका तरुणाने स्थानकावरुनच त्यांना आवाज दिला आणि ‘भाई दरवाजा बंद करुन घे’ सांगितलं. आवाज ऐकताच जोडपं शुद्धीत आलं आणि त्यांनी दरवाजा बंद करुन घेतला. 

मेट्रो स्थानकावरील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ इंस्टाग्रामला शेअर करण्यात आला आणि काही वेळातच तुफान व्हायरल झाला. 

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरीही त्यावर तुफान कमेंट्स करत आहेत. एका युजरने OYO चं ओपन थिएटर लिहिलं आहे. तर एकाने मेट्रोचं तिकीट घ्या आणि मोफत शो पाहा असं लिहिलं आहे. एका युजरने मस्करीत लिहिलं आहे की, ‘आता OYO वाल्यांनी रुममध्ये दरवाजा बंद करुन घ्या असा बोर्डही लावायला हवा असं म्हटलं आहे’.





Source link

सामाजिक-धार्मिक सुधारणेत रानडे-भांडारकर हे जोडनाव, डाॅ. सदानंद मोरे यांचे मत

0
सामाजिक-धार्मिक सुधारणेत रानडे-भांडारकर हे जोडनाव, डाॅ. सदानंद मोरे यांचे मत



ranade bhandarkar is combination of names in socio religious reforms says dr sadanand more || सामाजिक-धार्मिक सुधारणेत रानडे-भांडारकर हे जोडनाव, डाॅ. सदानंद मोरे यांचे मत





Source link

भारतातील ‘या’ गावात पहाटे 3 वाजता सकाळ अन् दुपारी 4 वाजता होतो अंधार, निसर्ग पर्यटकांना लावतो वेड

0
भारतातील ‘या’ गावात पहाटे 3 वाजता सकाळ अन् दुपारी 4 वाजता होतो अंधार, निसर्ग पर्यटकांना लावतो वेड


भारतात अनेक छोटी मोठी गावं वसलेला देश असून इथे निसर्गाच्या सान्निध्यात अनेक गाव वसलेली आहे. इथल्या प्रत्येक गावांची स्वतःची खासियत असून इथे त्यांची स्वतःची परंपरा, संस्कृती आहे. भारतातील या गावांना बघिण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. भारतात एक असं गाव आहे जिथे सूर्यादय पहाटे 3 वाजता तर सूर्यास्त दुपारी 4 वाजता होतो. हो, अगदी खरं आहे, या गावात सूर्याचं दर्शन भारतात सर्वप्रथम होतं. तसंच या गावात अंधारही सर्वात पहिले होतो. तुम्हाला या गावाबद्दल माहिती आहे का?

कुठे आहे भारतात हे गाव!

जवळजवळ सर्वांनाच माहिती आहे की, भौगोलिक हालचालींमुळे, सूर्यकिरणे भारताच्या पूर्वेकडील भागात प्रथम पडतात आणि सूर्यकिरणे शेवटचे पश्चिमेकडील भागात दिसतात. त्याच वेळी, पूर्वेकडील भागात सूर्य सर्वात आधी मावळतो, ज्यामध्ये अरुणाचल प्रदेशचा समावेश आहे. सूर्यकिरणांची पहिली झलक इथे असल्याने, याला उगवत्या सूर्याची भूमी असंही ओळखलं जातं. 

संपूर्ण अरुणाचल प्रदेशात एक गाव असे आहे जिथे सूर्याची किरणे सर्वात आधी पडतात. तुम्ही तुमच्या घरात गाढ झोपलेले असताना, तिथे आधीच दिवस उजाडलेला असतो. खरंतर, या गावाचे नाव डोंग आहे. आजूबाजूच्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या वेळेत थोडा फरक आहे. मात्र अरुणाचल प्रदेशातील या गावात सूर्योदय प्रथम होतो आणि सूर्यास्त देखील या गावात प्रथम होतो. येथील सूर्योदयाची वेळ पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान असते. त्याच वेळी, दुपारी 4 वाजेपर्यंत इथे अंधार पडतो.

या डोंग गावात पर्यटकांची संख्याही सतत वाढत आहे. अरुणाचल प्रदेशातील या गावात लोक विशेषतः सूर्योदय आणि सूर्यास्ताचे हे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी येत असतात. इथे शांत वातावरण आणि ग्रामीण परिसर लोकांचे मन मोहून टाकतो. गेल्या काही वर्षांपासून नवीन वर्षात येथे पर्यटकांची संख्या वाढली आहे. हे दृश्य पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी प्रत्येकजण येथे येतात. त्यामुळे, येथील लोकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी राज्य सरकार विकासाच्या गतीवर लक्ष केंद्रित करत आहे.





Source link

आजच्या काळात ताण कमी करण्यासाठी पतंजली योग हा एक प्रभावी मार्ग का मानला जातो?

0
आजच्या काळात ताण कमी करण्यासाठी पतंजली योग हा एक प्रभावी मार्ग का मानला जातो?


Patanjali Yoga : आजकालच्या धकाधकीच्या जीवनाचा परिणाम आपल्या शरीर, बुद्धी आणि सामाजिक नात्यांवर सुद्धा होऊ शकतो. लोक जगत असलेल्या जीवनातील तोटे समजून घेणे आणि त्यांना हाताळणे फार महत्वाचे आहे. जर तुम्हाला आरोग्यदायी जीवन जगायचे असेल तर योग्यवेळी खाणे, रोज थोडा व्यायाम करणे आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांशी चांगले नाते असणे गरजेचे असते आणि योग या सर्व गोष्टींना सोपं बनवतो. योग केल्याने फक्त शरीराला आणि मनाला फायदा मिळत नाही तर इतरांशी जुडण्यास आणि खुश राहण्यास सुद्धा मदत होते. 

पतंजली योग या सर्व गोष्टींची काळजी घेतो आणि मॉडर्न लाइफस्टाइलमध्ये लोकांचा ताण कमी करण्याची पद्धत समजावतो. परंतु सर्वात मोठा प्रश्न उद्भवतो की आजच्या काळात तणाव कमी करण्यासाठी पतंजली योग हा सर्वात प्रभावी मार्ग का मानला जातो? 

परंतू यापूर्वी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की आजकालच्या जीवनात कोण कोणत्या कारणांमुळे ताण येतो. 

खूप वेगवान आणि धावपळीचं जीवन 
प्रत्येक ठिकाणावरून खूप माहिती मिळणं ज्यामुळे डोकं खूप जड होतं. 
वर्क लाईफ आणि वैयक्तिक आयुष्यात संतुलन राहणे. 
सोशल मीडियावर नेहमी एक्टिव असणे आणि जास्तवेळ घालवणे 
पैशांमुळे येणारा ताण 
आरोग्यामुळे येणारा ताण  

पतंजली योग या सर्व समस्यांवर लक्ष ठेऊन आणि तणाव हाताळण्याचा पूर्णपणे संतुलित मार्ग देते. पतंजली योगाचे वेगवेगळे भाग तणाव कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. 

1. आसन (Physical Postures) – आसन आपल्या शरीराला लवचिकता आणि ताकद देते, ज्यामुळे शरीरावरचा ताण कमी होतो. जर पतंजली योगानुसार जर रोज आसन केलं तर स्नायू घट्ट होतात तसेच रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुद्धा चांगली होते. ज्यामुळे खूप आराम मिळतो. 

2. प्राणायाम  (Breathing Exercises) – प्राणायाममध्ये श्वास व्यवस्थित घेणं आणि सोडणं शिकवलं जातं. यामुळे डोकं शांत होतं आणि शरीरावरचा ताण  कमी होतो. मनात चाललेल्या विचारांचं द्वंद्व शांत करण्यात आणि भावनांना आवर घालण्यात मदत मिळते. 

3. ध्यान (Meditation) – ध्यानधारणा केल्याने मन शांत राहतं आणि असंख्य विचार करण्याऱ्या मनावर यामुळे आवर घालता येतो. आज धावपळीच्या जीवनात मन शांत ठेवणं खूप गरजेचं आहे. ध्यानधारणेमुळे हे शक्य होऊ शकतं. पतंजली ध्यान केल्याने हे साध्य होते आणि वैज्ञानिक संशोधनाने हे देखील सिद्ध केले आहे की यामुळे तणावाची पातळी कमी होते आणि विचार करण्याची शक्ती वाढते.

4. यम आणि नियम (Ethical Principles and Personal Disciplines) – यम आणि नियम हे आपल्याला चांगलं माणूस बनवण्याची शिकवण देते. जसे कोणत्याही व्यक्तीला नुकसान न पोहोचवणे, कोणाशीही भांडण न करणे, आपल्याकडे जे आहेत त्यात खुश राहणं. यामुळे नात्यांमध्ये शांतता आणि अनावश्यक चिंता देखील कमी होते. 

5. प्रत्याहार (Withdrawal of Senses) – प्रत्याहार म्हणजे तुमच्या इंद्रियांना आराम देणं, जसे काही वेळासाठी मोबाईल आणि टीव्ही पासून दूर राहणं. ज्यामुळे आंतरिक शांती मिळते. 

6. धारणा (Concentration) – धारणा म्हणजेच एका गोष्टीवर ध्यान लावणे. जेव्हा आपण एका कामावर फोकस करतो तेव्हा ते काम लवकर आणि चांगले होते. ज्यामुळे तणाव वाढत नाही. एकाग्रतेमुळे लक्ष विचलित होतं नाही आणि आपण स्वतःला नियंत्रित करू शकतो. 

पतंजली योग हा ताणतणाव नियंत्रित करण्याचा एक चांगला उपाय आहे. कारण हा उपाय अतिशय अभ्यासपूर्वक बनवण्यात आला असून काळानुसार तो अतिशय उपयोगाचा आहे. सध्याच्या मॉर्डेन सायन्सनुसार योगाचे वेगवेगळे भाग आहेत जसं की प्राणायाम, ध्यान, आसन इत्यादी जे आजच्या तणावासाठी उत्तम उपचार आहेत. या कारणास्तव, पतंजली योग आता केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात दत्तक घेत आहेत.

(Disclaimer – This article is part of India Dotcom Pvt Lt’s consumer connect initiative, a paid publication program IDPL claims no editorial involvement and assumes no responsibility or liability for any errors or omissions in the content of the article.)

 





Source link

लबाडी करणाऱ्यांबरोबर उध्दव ठाकरे जाणे अशक्य, संजय राऊत यांची अमित शहा यांच्यावर टीका

0
लबाडी करणाऱ्यांबरोबर उध्दव ठाकरे जाणे अशक्य, संजय राऊत यांची अमित शहा यांच्यावर टीका



shiv sena uddhav thackeray can not go with those who lie sanjay raut criticizes amit Shah || लबाडी करणाऱ्यांबरोबर उध्दव ठाकरे जाणे अशक्य, संजय राऊत यांची अमित शहा यांच्यावर टीका





Source link

पतंजली योग तंत्रांचा वापर करून आरोग्य सहज आणि नैसर्गिकरित्या कसे परत मिळवू शकतो?

0
पतंजली योग तंत्रांचा वापर करून आरोग्य सहज आणि नैसर्गिकरित्या कसे परत मिळवू शकतो?


 Patanjali Yoga Techniques : योग ही भारतातील प्राचीन विद्या आहे. योग आता जगभरात लोकप्रिय झाला. योग विद्येमुळे आरोग्य  चांगली  जीवनशैली मिळत आहे. योगाचे अनेक प्रकार आहेत, परंतु पतंजलीची योगसूत्रे सर्वात आवश्यक मानली जातात. योग विद्या एक असा ग्रंथ आहे ज्यामध्ये योगाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी आणि ते कसे करावे हे स्पष्ट केले आहे. जर एखाद्या व्यक्तीने पतंजलीच्या शिकवणी योग्यरित्या समजून घेतल्या आणि त्यांचे आचरण केले तर तो केवळ शारीरिक तंदुरुस्तीच नाही तर स्पष्ट विचार, भावनिक संतुलन आणि आंतरिक तसेच आध्यात्मिक प्रगती देखील मिळवू शकतो. 

पतंजलीचे योग तत्वज्ञान 

योगाचे जनक म्हणून ओळखले जाणारे पतंजली यांनी सुमारे इसवी सन 400 पूर्वीची योगसूत्र यात लिहिले आहे. यात  एकूण 196 लहान सूत्रे आहेत, जी योगसाधकांना आत्मज्ञानाकडे जाण्याचा मार्ग दाखवतात.
पतंजलीचे तत्वज्ञान योगाच्या आठ भागांवर आधारित आहे, ज्यांना अष्टांग योग म्हणतात. या अवयवांमध्ये नैतिक तत्वे (यम आणि नियम), शारीरिक आसने (आसन), श्वास नियंत्रण (प्राणायाम), इंद्रियांचा त्याग (प्रत्याहार), एकाग्रता (धारणा), ध्यान (ध्यान) आणि अंतिम आत्मसात (समाधी) यांचा समावेश आहे.

पतंजली योग तंत्राचा अवलंब करण्याचे फायदे

पतंजलीने सांगितलेल्या योगासनांचा आणि श्वास घेण्याच्या तंत्रांचा (प्राणायाम) दररोज सराव केला तर तुमच्या शरीरात लवचिकता आणि शक्ती वाढते. यामुळे जुनाट वेदना कमी होण्यास मदत होते. शरिरीक स्थिती सुधारते.  रोगांविरुद्ध  प्रतिकारशक्ती देखील वाढू शकते.

पतंजली योग शिकवणीमुळे एकाग्रता वाढते. मन शांत करण्यास, ताण कमी करण्यास आणि संज्ञानात्मक कार्य वाढविण्यास मदत करते. धारणा आणि ध्यान केल्याने एकाग्रता वाढण्याची क्षमता वाढते आणि स्मरणशक्ती सुधारते.
यम आणि नियम – जीवन जगण्यासाठीच्या नैतिक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून करुणा, प्रामाणिकपणा, आत्म-शिस्त आणि समाधान विकसित करू शकतात. यामुळे भावनिक लवचिकता वाढते, नातेसंबंध सुधारतात आणि आंतरिक शांतीची भावना निर्माण होते.

योगातील पतंजलीचे अंतिम ध्येय आत्म-साक्षात्कार आहे.  ही एक गहन आध्यात्मिक जागृतीची अवस्था आहे. अहंकाराच्या मर्यादा ओलांडून देवाशी एकरूपतेचा अनुभव घेता येवू शकतो. आठ अंगांचे परिश्रमपूर्वक पालन करून, साधक चेतनेच्या या उच्च अवस्थेकडे प्रगती करू शकतात.

 





Source link

‘आई कुठे काय करते’ मालिकेची खलनायिका ‘स्टार प्रवाह’वर पुन्हा येणार…; नव्या शोबद्दल म्हणाली, “मी लगेच होकार दिला कारण…”

0
‘आई कुठे काय करते’ मालिकेची खलनायिका ‘स्टार प्रवाह’वर पुन्हा येणार…; नव्या शोबद्दल म्हणाली, “मी लगेच होकार दिला कारण…”



aai kuthe kay karte fame sanjana aka rupali bhosale comeback on new cooking show ‘आई कुठे काय करते’ मालिकेची खलनायिका ‘स्टार प्रवाह’वर पुन्हा येणार…; नव्या शोबद्दल म्हणाली, “मी लगेच होकार दिला कारण…”





Source link

फलटणमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; माजी आमदार दीपकराव चव्हाण आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे अभिवादन

0
फलटणमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; माजी आमदार दीपकराव चव्हाण आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे अभिवादन

फलटण | १४ एप्रिल २०२५ —समतेचा संदेश देणाऱ्या आणि भारतीय लोकशाहीचे शिल्पकार असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त फलटण शहरातील आंबेडकर चौकात अभिवादनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमात आमदार मा. दीपकराव चव्हाण व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विशेष उपस्थिती लावून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली. यावेळी नगरसेवक सनी अहिवळे, श्रीराम कारखान्याचे संचालक महादेवराव माने, दादासाहेब चोरमले, अनिल शिरतोडे, रामभाऊ मदने, अय्याज शेख, हरिष काकडे, संग्राम अहिवळे, लक्ष्मण काकडे, गणेश बिर्‍हाडे, रोहित विलास अहिवळे, दत्तात्रय मोहिते आणि पत्रकार प्रशांत अहिवळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

या वेळी ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, फलटण’चे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाद्वारे डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा जागर घडवण्यात आला.

आंबेडकर जयंती विशेष: तुझ्यामुळेच मार्ग हा आम्हाला लाभला, तुझ्यामुळेच सूर्यही पुन्हा प्रकाशला; जाणून घेऊ बाबासाहेब आणि शाहू महाराजांमधील ऋणानुबंध…!

0
आंबेडकर जयंती विशेष:  तुझ्यामुळेच मार्ग हा आम्हाला लाभला, तुझ्यामुळेच सूर्यही पुन्हा प्रकाशला; जाणून घेऊ बाबासाहेब आणि शाहू महाराजांमधील ऋणानुबंध…!


  • Marathi News
  • Opinion
  • Dr. Babasaheb Ambedkar And Chhatrapati Shahu Maharaj Relation; Ambedkar Jayanti Special | Bhimjayanti

अनुराधा पाटील1 तासापूर्वी

  • कॉपी लिंक

‘फुले-शाहू-आंबेडकर’ ही त्रयी म्हणजे भारतातील सामाजिक न्याय, समता आणि मानवमुक्तीच्या चळवळीचे तीन महान स्तंभ आहेत. यामधील शाहू आणि आंबेडकर या द्वयींमधील मैत्री स्नेह आणि समतेचा इतिहास अजरामर आहे. माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारलेल्या अस्पृश्य समाजाला हक्क मिळवून देणे, ज्ञानाची कवाडे त्यांच्यासाठी खुली करणे, अस्पृश्यता निवारण करणे ही या दोघांच्या कार्यामध्ये असलेली समानता. आज डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊ बाबासाहेब आणि शाहू महाराज यांच्यातील ऋणानुबंध…

‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ असे आवाहन डॉ. बाबासाहेबांनी केले. त्यामुळे दलित आणि वंचित वर्ग अन्यायाविरुद्ध पेटून उठला. बाबासाहेब महात्मा फुले यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालत होते. शाहू महाराज नेहमीच त्यांचे पाठीराखे राहिले. शाहू महाराजांना नेहमी वाटे की, अस्पृश्य समाजाने स्वावलंबी व्हावे. आपल्या जातीचे पुढारी निवडावेत. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रगती करावी. ते नेहमी जातीपेक्षा गुणवत्तेला प्राधान्य दिले. अशातच भीमराव आंबेडकर नावाचा तरुण मुलगा परदेशात जाऊन, इतक्या उच्च पदव्या प्राप्त करून आला. ही बातमी समजतात महाराजांना विलक्षण आनंद झाला.

शाहू महाराजांना डॉ. बाबासाहेबांना भेटण्याची उत्सुकता निर्माण झाली. आंबेडकरांचा पत्ता मिळताच, हा कोल्हापूर संस्थानाचा राजा कोणत्याही मानापमानाचा विचार न करता, त्यांची भेट घेण्यासाठी मुंबईमधील परळ चाळीमध्ये गेला. शाहू महाराजांनी आंबेडकरांना मिठी मारली आणि म्हणाले, ‘आता माझी काळजी दूर झाली, अस्पृश्यांना पढारी मिळाला.

स्नेहाचे नाते…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्यात कमालीचा स्नेह होता. मैत्री आणि आपुलकी कशी असावी, याचे ते उत्तम उदाहरण होते. जातिव्यवस्थेविरुद्ध लढा देणारा आणि डॉ. आंबेडकरांच्या शिक्षणाला आकार देणारा हा राजा होताच. सोबतच त्यांनी महिला आणि मुलांच्या हक्कांचेही समर्थक केले. त्यांच्या सुधारणांमुळे वर्षानुवर्षे अस्तित्वात असलेल्या पुरातन संस्थांमध्ये अनेक बदल झाले. महाराजांच्यातील ही गोष्ट आंबडकारांना खूप आवडली. शाहू महाराजांचेच नाही तर संपूर्ण करवीर संस्थानांचे आंबेडकरांसोबत असणारे ऋणानुबंध वेगळे होते. हे ऋणानुबंध केवळ सामाजिक नव्हे, तर जिव्हाळ्याचे होते.

महाराजांनी रमाबाईंना ‘बहीण’ म्हणून माहेरपणासाठी नेण्याची तयारी दाखविणे किंवा महाराजांचे पुत्र राजाराम महाराज व कन्या आक्कासाहेब यांनी बाबासाहेबांना ‘मामा’ म्हणून संबोधणे. यावरून शाहू महाराज व बाबासाहेब यांच्यामधील नाते कसे होते, ते समजते. यांची भेट खूप कमी वेळा झाली. पण बाबासाहेब इंग्लंडला जरी असले, तरी देखील यांच्यातील जिव्हाळ्याचे पत्रव्यवहार राहिले. शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यात पहिल्यांदा मागासवर्गीयांसाठी आरक्षण सुरू केले. याच विचारसरणीचा पुढे डॉ. आंबेडकरांनी भारताच्या संविधानात समावेश केला.

महाराजांकडून आर्थिक मदत…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परदेशातील उच्चशिक्षणासह जनजागृतीच्या कार्यासाठी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी आर्थिक पाठबळ दिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या एका भेटीत आपण मूकनायक हे वृत्तपत्र चालवत असल्याचे सांगितले. पण काही आर्थिक अडचणींमुळे मूकनायक हा मूक झालाय याची खंत व्यक्त केली. त्यानंतर हा बंद पडलेले मूकनायक पुन्हा सुरू झाले. त्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी अडीच हजार रुपयांची मदत केली. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिक्षणासाठी लंडनला गेले, तेव्हा त्यांनी शाहू महाराजांना पत्र लिहले. त्यांनी त्या पत्रातून शिक्षणासाठी 200 पौंडची आर्थिक मदत मागितली आणि शाहू महाराजांनी ती त्वरित पाठवली. जातीय लढाईत शिक्षणाच महत्त्व माहित असलेल्या शाहू महाराजांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण खूपच महत्त्वाचे वाटत होते. त्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येता कामा नये, यासाठी महाराज नेहमी प्रयत्नशील राहिले. त्यानंतर 26 जानेवारी 1922 ला बाबासाहेबांनी शाहू महाराजांना पुन्हा पत्र पाठवले. मला भारतात येण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे घरी खर्चाची अडचण होणार आहे, तरी महाराजांनी 750 रुपयांची मदत केल्यास मी त्यांचा ऋणी राहीन, असे कळले. या पत्रानंतर लगेचच महाराजांनी 750 रुपयाची मनीऑर्डर पाठवण्याची व्यवस्था केली. बाबासाहेबांनी त्यांच्या शिक्षणात कोणत्या ही प्रकारचा अडथळा येऊ नेऊ ही जबाबदारी शाहू महाराजांनी घेतली. बाबासाहेबांच्या जडणघडणीत महाराजांचे योगदान हे खूप मोलाचे होते.

माणगाव परिषदेची तयारी…

अस्पृश्य समाजात शिकून तयार झालेल्या एवढ्या मोठ्या विद्वानास कोल्हापुरात नेऊन, त्यांच्या हस्ते आपल्या संस्थानातील अस्पृश्यांची सुधारणा व उद्धार करावा असे शाहू महाराजांना वाटले. मात्र, सुरुवातीला आंबेडकरांनी यामध्ये कणभर ही रुची दाखवली नाही. डॉ. आंबेडकर म्हणाले की, ‘आपल्यासाठी कुणी काही करत नाही. सर्वजण सारखे आहेत.’ तेव्हा बहिष्कृत जातीतील उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी दत्तोबा पवार यांनी आंबेडकरांना सांगितले की, महाराज त्यातले नाहीत. त्यांनी आपल्या संस्थानात अस्पृश्यांबद्दल कळवळ्याने काम चालू केले आहे.’ त्यानंतर आंबेडकरांनी कोल्हापूर भेटीचे आमंत्रण स्वीकारले. डॉ. आंबेडकर कोल्हापूरस आले, तेव्हा महाराजांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत त्यांचे स्वागत केले. त्यांची आपल्या खास गेस्ट हाऊसमध्ये त्यांची राहण्याची सोय केली. या भेटीत दोघांमध्ये अस्पृश्यांच्या सुधारणांवर चर्चा झाली. त्यांनी एक सभा घेण्याचे ठरवले. या भेटीनंतर डॉ. आंबेडकर हे दोन दिवस कोल्हापुरात राहून मुंबईत परतले. त्यानंतर दत्तोबा पवारांनी पुढाकार घेऊन शाहू महाराज व कोल्हापुरातील अस्पृश्यांचे पुढारी डॉक्टर रमाकांत कांबळे, गंगाराम कांबळे या सर्वांशी चर्चा केली. त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर डॉ.आंबेडकरांशी पत्रव्यवहार करून 21 मार्च 1920 या दिवशी माणगावमध्ये अस्पृश्यांची पहिली सभा घेण्याचे ठरले. तशी पत्रके छापली.

अन् पुढारी गवसला…

जातीव्यवस्थेविरुद्ध लढा देणारा, डॉ. आंबेडकरांच्या शिक्षणाला आकार देणारा राजा. ते महिला आणि मुलांच्या हक्कांचे समर्थक होते. त्यांच्या सुधारणांमुळे वर्षानुवर्षे अस्तित्वात असलेल्या पुरातन संस्थांमध्ये अनेक बदल झाले. शाहू महाराजांमधील ही गोष्ट आंबेडकरांना खूप आवडली. शाहू महाराजांचेच नाही तर संपूर्ण करवीर संस्थानांचे आंबेडकरांसोबत असणारे ऋणानुबंध वेगळे होते. अस्पृश्य समाजात शिकून तयार झालेल्या एवढ्या मोठ्या विद्वानास कोल्हापुरात आणावे. त्यांच्या हस्ते आपल्या संस्थानातील अस्पृश्यांची सुधारणा व उद्धार करावे, असे शाहू महाराजांना वाटले. त्यानुसार ही अस्पृश्य परिषद पार पडली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जाणीवपूर्वक काही ठराव प्रत्येक परिषदेत घेत असत. ठराव म्हणजे तत्कालीन समूहाचे लोकमत, असाच त्याचा अर्थ होता आणि सर्वांसमक्ष त्या ठरावाच्या मागण्यांना लोकाश्रय मिळविण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यशस्वी होत असत. त्यामुळे माणगाव परिषदेतही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सल्ल्याने व कुशल मार्गदर्शनाखाली एकूण पंधरा ठराव घेतलेले गेले. या ठरावापैकी पहिले तीन ठराव हे तात्कालीक व औपचारिक स्वरूपाचे होते. ही परिषद ऐतिहासिकदृष्ट्या अंत्यत महत्त्वाची होती. माणगाव परिषदेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली. माणगाव परिषदेच्या पहिल्या दिवशी शाहूंनी त्यांच्या रांगड्या भाषेत ‘आता तुम्हाला पुढारी गवसला आहे. दुसऱ्या पुढाऱ्याच्या नादाला लागू नका. आता हाच पुढारी तुमचा उद्धार करणार आहे. सगळ्या भारतातील अस्पृशांचा हा पुढारी होणार आहे यात तीळमात्र शंका नाही.’ असे सांगितले. दलित समाजाला डॉ. आंबेडकर यांच्या रूपाने नेतृत्व मिळाल्याचे राजर्षी शाहूंनी जाहीर केले. माणगाव परिषदेत शाहूमहाराज म्हणाले ‘आंबेडकर हे ‘मूकनायक’ पत्र काढतात व सर्व मागासलेल्या जातीचा परामर्ष घेतात. याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो.’ माणगाव ची परिषद आंबेडकरांच्या उपस्थितीमुळे समृद्ध झाली. अस्पृश्यांना तिच्यामुळे प्रेरणा मिळाली व शाहूंनी सांगितल्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर भारताचे फार मोठे नेते बनले.

स्पृश्य-अस्पृश्यांच्या शाळा एकत्र…

दलितांच्या हक्कासाठी माणगाव परिषदेत अनेक ठराव मंजूर केले गेले. यातील पहिले तीन ठराव हे तात्कालिक व औपचारिक स्वरूपाचे होते. ठराव क्रमांक चार बहिष्कृत लोकांच्या मानवी हक्कासाठी होता. सार्वजनिक रस्ते, विहिरी, तलाव, शाळा, धर्मशाळा तसेच लायसन्स खाली असलेल्या करमणुकीच्या जागा, भोजनगृह, वाहने इत्यादी सार्वजनिक सोयींचा उपभोग घेण्याचा त्यांना हक्क आहे. त्याबरोबरच गुणसिद्ध योग्यतेने त्यांना व्यापार करण्याचा व नोकरी मिळण्याचा हक्क आहे. ठराव क्रमांक 5, 6, 7 आणि 8 हे शिक्षणासंबंधी होते. याठिकाणी हे लक्षात घ्यायला हवे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्या काळातील अस्पृश्य वर्गातील एकमेव उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्त्व होते. शिक्षणाचे महत्त्व त्यांना पुरेपूर पटलेले होते म्हणून ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या ब्रीदाची जाहीरपणे वाच्यता करण्यापूर्वीच डॉ. आंबेडकरांनी शिक्षण हीच परिवर्तनाची गुरूकिल्ली आहे, हे माणगावच्या सभेतून स्पष्ट केले. प्राथमिक शिक्षण मुलामुलींना कोणताही भेदभाव न करता मिळावे, बहिष्कृत वर्गाच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून त्याच वर्गातील इन्स्पेक्टर नेमावेत, अस्पृश्यांना शिष्यवृत्ती द्यावी आणि स्पृश्य व अस्पृश्य यांच्या शाळा एकत्र असाव्यात, अशा मागण्या या परिषदेत करण्यात आल्या.

माणगाव परिषदेतला 9 वा ठराव हा महार वतनदारांना होत असलेला त्रासाचा होता. त्यामध्ये महार वतनदारांना पड वगैरे अगदी गलिच्छ कामे करावी लागत. त्यामुळे त्यांच्या वतनदारीवर कमीपणाची छटा उमटली आहे. वतनी जमीन वतनदारांना पिढ्यानपिढा विभागातून जात असल्यामुळे जमिनीचे इतके बारीक तुकडे झालेले आहेत की , दर एक महार वतनदारास पुरेशी पैदास होत नसल्यामुळे त्याची अगदी कंगाल स्थिती होत आहे, तर या परिषदेत यामुळे वतन पद्धतीत फेरफार करणे अगदी जरुरी झाले आहे, असे या परिषदेचे ठाम मत होते. महारकी वतन सर्व महार लोकात विभागून सर्वांनी दारिद्र्य व कंगाल राहण्यापेक्षा ते वतन थोड्या लोकात विभागून त्यांची स्थिती मानास्पद व सुखावह करावे, असा ठराव करण्यात आला. ठराव क्रमांक 10 हा मेलेल्या जनावरांचे मांस कोणत्याही जातीच्या माणसाने खाणे हा गुन्हा आहे, असे कायद्याने मानले जावे हा होता. ठराव क्रमांक 11 तलाठ्यांच्या जाग्यांवर बहिष्कृत वर्गाच्या नेमणुका होत जाव्यात, अशी या परिषदेची मागणी होती. ठराव क्रमांक 12 हा बहिष्कृत वर्गाचा राजकीय किंवा सामाजिक हितसंचय यावर होता. बहिष्कृत संस्थांचे आणि व्यक्तींचे उपाय या बहिष्कृत वर्गात सर्वस्वी मान्य होतात, असे सरकारने समजू नये असे या परिषदेचे आग्रहाचे सांगणे होते. ठराव क्रमांक 13, 14, 15 हे अधिकाऱ्यांनी या परिषदेच्या ठरावाला घेऊन कोणती कामे करावीत यावर होते.

‘लोकमान्य ‘ही पदवी दिली…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्यातील पत्रे अभ्यासूंनी जरूर वाचावीत. या पत्रव्यवहारात राजर्षी शाहूंनी डॉ. आंबेडकर यांना ‘लोकमान्य’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला होता. त्याकाळी लोकमान्य ही पदवी फक्त बाळ गंगाधर टिळक यांना होती. शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीची पारख काळाच्या पुढे जाऊन विचार करणारी होती, याची प्रचिती अस्पृश्य समाजाच्या परिषदेच्या भाषणातून येते. शाहू महाराज बाबासाहेबांच्या प्रतिभेचा गौरव करताना म्हणतात, ‘लोकहो तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढला. यासाठी मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो. इतकंच नव्हे, तर एक वेळ अशी येईल की, ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील, अशी माझी मनोदेवता मला सांगत आहे.’ पुढे जाऊन बाबासाहेबांनी संपूर्ण विश्वात ओळख बनवली. दलितांचा स्वतंत्र राजकीय आवाज निर्माण केला. अस्पृश्यता निर्मूलणासाठी लढा दिला. दलित समाजातील तरुणांना शिक्षणासाठी प्रेरित केले. राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी सर्व भारतीयांना समान हक्क मिळवून दिले आणि शाहूनी म्हटल्या प्रमाणे ते त्यांचे पुढारी देखील बनले.



Source link