



Share Market Bank Holidays Update After Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय सशस्त्र दलांनी नऊ पाकिस्तानी दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. दुसरीकडे, आज ७ मे २०२५ रोजी देशभरात मॉक ड्रिल आयोजित केले जात आहेत. कोणत्याही ‘हल्ला’ किंवा आपत्कालीन परिस्थितीत लोकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे कवायती आयोजित केली जाईल. या दरम्यान, हवाई हल्ल्याचा सायरन, सराव आणि इतर आवश्यक पावले समाविष्ट आहेत. १९७१ नंतरचा हा पहिलाच आपत्कालीन सराव आहे. २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा सराव आयोजित केला जात आहे, ज्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला होता. अशा परिस्थितीत, सोशल मीडियावर बरेच लोक आज बँका आणि शेअर बाजार उघडतील की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
अधिकृत माहितीनुसार, ७ मे २०२५ रोजी भारतीय शेअर बाजार बंद राहणार नाहीत. मॉक ड्रिल असूनही, शेअर बाजार सामान्यपणे काम करतील. मे महिन्यात महाराष्ट्र दिनानिमित्त फक्त १ मे रोजी शेअर बाजार बंद होता. याशिवाय, दर शनिवारी आणि रविवारी बाजाराला नियमित सुट्टी असते.
(हे पण वाता – Mock Drill दरम्यान ऑफिस-शाळा-कॉलेज-बँका सुरु राहणार की बंद?)
७ मे २०२५ रोजी खाजगी आणि सरकारी बँका खुल्या राहतील. बहुतेक राज्यांमध्ये दुपारी ४ वाजल्यापासून मॉक ड्रिल आयोजित केले जाईल, त्यामुळे बँकिंग सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही. मे महिन्यात शेअर बाजाराला फक्त महाराष्ट्र दिनी (१ मे) सुट्टी होती. याशिवाय, दर शनिवारी आणि रविवारी नियमित सुट्टी असेल.
> ९ मे: रवींद्रनाथ टागोर जयंतीनिमित्त बंगाल आणि कोलकातामध्ये बँका बंद.
> १० मे: दुसऱ्या शनिवारी, संपूर्ण भारतात बँका बंद.
> ११ मे: रविवार, साप्ताहिक सुट्टी.
> १२ मे: बुद्ध पौर्णिमेनिमित्त संपूर्ण भारतात बँका बंद.
> १६ मे: राज्य दिनानिमित्त सिक्कीममध्ये बँका बंद.
> १८ मे: रविवार, साप्ताहिक सुट्टी.
> २४ मे: चौथा शनिवार, संपूर्ण भारतात बँका बंद.
> २५ मे: रविवार, साप्ताहिक सुट्टी.
> २६ मे: काझी नजरुल इस्लाम जयंतीनिमित्त त्रिपुरामध्ये बँका बंद.
> २९ मे: महाराणा प्रताप जयंतीनिमित्त हिमाचल प्रदेशात बँका बंद.
७ मे २०२५ रोजी, लोकांच्या सोयीसाठी सर्व बँका आणि शेअर बाजार खुले राहतील. बँकांच्या सुट्ट्यांच्या काळातही एटीएम, मोबाईल बँकिंग, ऑनलाइन बँकिंग आणि दैनंदिन व्यवहारांसाठी बँक अॅप्स कार्यरत राहतील. कोणत्याही प्रकारच्या बँकेच्या देखभालीच्या वेळी किंवा तांत्रिक समस्येच्या दिवशी, बँकेकडून विशेष माहिती पाठवली जाते.

परदेशातील विद्यापीठांच्या अर्ज प्रक्रियेमध्ये शिफारसपत्राचे जेवढे महत्त्व आहे तेवढेच किंबहुना त्याहूनही अधिक महत्त्वाचे असते योग्य शिफारसकर्त्याची निवड करणे. शिफारसपत्रांबद्दल विद्यार्थ्यांचा असा समज असतो की कोणा उच्चपदस्थांकडून त्यांना शिफारस मिळाली तर परदेशी विद्यापीठ किंवा कॉलेजमधील प्रवेश किंवा शिष्यवृत्तीच्या त्यांच्या संधी वाढतात. मात्र, परदेशी विद्यापीठे शिफारसपत्र तपासताना विद्यार्थी व शिफारसकर्ता यांचा संबंध किती वर्षांचा आणि कशा प्रकारचा आहे हे जरूर बघतात. त्यामुळेच तुम्हाला शिफारस देणाऱ्या शिक्षक किंवा प्राध्यापकांचे पद महत्त्वाचे नसून तुम्ही त्यांच्याबरोबर किती वेळ व्यतीत केला आहे, ते शिक्षक/प्राध्यापक तुम्हाला कशाप्रकारे ओळखतात आणि तुमच्या गुणदोषांची वस्तुनिष्ठपणे कसे विश्लेषण करतात या बाबी महत्त्वाच्या आहेत.
एक प्रभावी शिफारसपत्रात खालील गोष्टींचा समावेश असतो.
● शिफारसकर्त्याची भूमिका आणि विद्यार्थ्याशी असलेले नाते
● विद्यार्थ्याचे अभ्यासातील योगदान
● विशिष्ट प्रकल्पांतील कामगिरीचे उल्लेख
● नेतृत्वगुण, समस्या सोडवण्याची पद्धत, वैचारिक स्पष्टता यांचे उल्लेख
● विद्यार्थ्याचा चारित्र्यदृष्ट्या समज आणि सामाजिक जाणीव
शिफारसकर्त्याने प्रत्येक मुद्दा ठोस उदाहरणासह मांडल्यास ते अधिक परिणामकारक ठरते.
लेटर ऑफ रेकमेंडेशन हे विद्यार्थ्याने त्याला शिकवलेल्या शिक्षक /प्राध्यापकांकडून किंवा त्याच्या शाळेतील कोणत्याही शिक्षकांकडून घ्यावे. ज्या क्षेत्रात किंवा विषयात विद्यार्थी करिअर निवडणार आहे त्या विषयाशी संबंधित प्राध्यापकांचे शिफारसपत्र जास्त महत्त्वाचे आहे. साधारणपणे प्रत्येक विद्यापीठाला अर्जासह तीन शिफारसपत्रे हवी असतात. परदेशी विद्यापीठांना ही शिफारसपत्रे विद्यार्थ्याला शिकवलेल्या किंवा त्याच्याबद्दल नीट माहिती असलेल्या, त्याच्याशी शैक्षणिक स्तरावर काम केलेल्या तीन वेगवेगळ्या शिक्षकांकडून मिळणे अपेक्षित असते. बऱ्याचदा शाळेबाहेरील एखादे शिक्षक, प्रोजेक्ट सुपरवायजर, एखाद्या ठिकाणी विद्यार्थ्याने जर इंटर्नशिप केली असेल तर तेथील वरिष्ठ आदींचे शिफारसपत्रही विद्यापीठांकडून स्वीकारले जाते.
काही विद्यापीठे फक्त दोन शिफारसपत्रेही स्वीकारतात. तुम्ही अर्ज करणार असलेल्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर किंवा कॉमनअॅपवर ही माहिती नीट तपासून घ्यावी. बऱ्याचदा काही विद्यापीठे तीनपैकी एक शिफारसपत्र हे स्कूल काउन्सेलरकडून यायला हवे अशी अट घालतात. जर एखाद्या शाळेकडे स्कूल काउन्सिलर उपलब्ध नसेल तर विद्यार्थ्यांची पंचाईत होते. अशा वेळी त्या विद्यार्थ्याने शाळेच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांकडून लेटर ऑफ रेकमेंडेशन घ्यावे. सर्वसाधारणपणे, अनेक विद्यार्थी दोन शिफारस पत्रे शिक्षक/प्राध्यापकांकडून आणि एक शिफारसपत्र हे प्राचार्यांकडून घेतात.
कॉमनअॅपवरील सर्व माहिती भारत असतानाच ‘रेकमेंडेशन्स’ या सेक्शनमध्ये तुमच्या शिफारसकर्त्यांचा ई-मेल अॅड करा. तुम्ही अर्ज जमा केल्यावर विद्यापीठ त्या रेकमेंडर्सना ई-मेल पाठवून तुमची शिफारस मागत असते. तुमच्या शिक्षक/प्राध्यापकांचा नेहमीच्या वापरामध्ये असलेला ई-मेल कॉमनअॅपवर लिहा. (कॉमनअॅप हे अमेरिकन विद्यापीठांना अर्ज करण्यासाठी उपलब्ध असलेले एक पोर्टल आहे. लेखमालेमध्ये पुढे त्याबद्दल माहिती पाहणार आहोत) तुमचा अर्ज जमा झाल्यानंतर तुमच्या रेकमेंडर्सना त्यांचा ई-मेल सतत चेक करायला सांगून तुमची शिफारस पत्रे पूर्ण करायला सांगा. तसेच, रेकमंडर्स काळजीपूर्वक निवडा. लवकरात लवकर त्यांना कॉमनअॅपवर रजिस्टर करून घ्या. त्यामुळे त्यांनी जमा केलेले अर्ज विद्यापीठांना अंतिम मुदतीपूर्वी पोचतील.
शिफारसपत्रे ही फक्त औपचारिकता नसून विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाची, क्षमतेची आणि जबाबदारीची साक्ष देणारे दस्तावेज असते. योग्य शिफारसकर्त्यांची निवड करून, वेळेत आणि विश्वासार्ह पद्धतीने शिफारसपत्र मिळवणे ही यशस्वी परदेशी शिक्षणाच्या दिशेने एक अत्यावश्यक पायरी आहे.
लेटर ऑफ रेकमेंडेशन हे शक्यतो शाळेमधील शिक्षक/ प्राध्यापकांचे शिफारसपत्र घेणे योग्य राहील. मात्र शाळेबाहेरील कोणत्याही व्यक्तीचे शिफारसपत्र जर तुम्ही घेणार असाल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखणाऱ्या किंवा त्यांच्या शिक्षणेतर उपक्रमांची किंवा इंटर्नशिप/वर्क एक्सपीरियन्सची योग्य माहिती असणाऱ्या व्यक्तीकडून शिफारसपत्र घेणे योग्य ठरेल. तुमच्या शाळेतील महाविद्यालयातील शिक्षकांची चांगले ठेवा. दररोजच्या क्लासमध्ये सहभागी व्हा. शिक्षकांशी गुणांच्या पलीकडे जाऊन संवाद साधत रहा. त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नाते तयार करा.
theusscholar@gmail.com



India hits Pakistan and POK: पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून भारतात तीव्र संताप व्यक्त केली जात होती. पाकिस्तानला धडा शिकवला जावा, अशी मागणी केली जात होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील भारताला समर्थन मिळत होतं. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय बैठका होत असताना लवकरच काहीतरी मोठं घडण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याचं उत्तर आता मिळालं असून भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून तब्बल ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. मध्यरात्री दीडच्या सुमारास भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राईक केला आहे. या मोहिमेला भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव देण्यात आलं आहे.


पिंपरी : भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे पादचारी तरुणाचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. ही घटना शिक्रापूर – चाकण रोडवर घडली.रोहित सत्यवान जाधव (रा. चाकण) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. सत्यम विजय कोते (वय २१, रा. हरी ओम कॉम्प्लेक्स, चाकण) आणि राहुल संतोष कोळी हे जखमी झाले. सत्यम याने चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. रामराव सौदाजी नांगरे (वय ५९, रा. सणसवाडी, ता. शिरूर) असे अटक केलेल्या आरोपी ट्रकचालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यम हे मित्र रोहित यांच्यासोबत भाकरी आणण्यासाठी चालले होते. ते शिक्रापूर-चाकण रोडवरील विशाल गार्डन चौकाजवळ आले असता रामराव चालवत असलेल्या ट्रकने एका थांबलेल्या जीपला धडक दिली. त्यानंतर रोहित यांनाही धडक दिली. या अपघातात रोहित यांचा मृत्यू झाला, तर सत्यम आणि राहुल हे जखमी झाले. फौजदार बोरकर तपास करीत आहेत.
भरधाव मोटारीने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. ही घटना पुणे – नाशिक महामार्गावर वाकीफाटा येथे घडली. अपघातानंतर मोटारचालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. संतोष गोविंद बेडुरे (वय ४६, रा. टेकवडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावेत येथे रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या मोटारीची काच फोडून मोटार पेटवून देण्यात आली. या प्रकरणी राघू पांडुरंग गव्हाळे (वय २७, रा. रमाबाईनगर, रावेत) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गव्हाळे यांनी सोमवारी गणेश सृष्टी या इमारतीसमोरील रस्त्यावर मोटार उभी केली होती. पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान अनोळखी व्यक्तीने दगडाने मोटारीची काच फोडली आणि मोटार पेटवून दिली.

F16 Shot Down by Air Defence System: पाकिस्तानसोबतच्या युद्धादरम्यान, भारताने पाकिस्तानचे धोकादायक लढाऊ विमान F-16 पाडले आहे. भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हे पाकिस्तानी विमान पाडल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून हे स्पष्ट होते की, पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो पराभूत होण्यापूर्वीच तो हाणून पाडण्यात आला.
तर काही दिवसांपूर्वी बातम्या येत होत्या की भारताकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने त्यांचे लढाऊ विमान F-16 मागे ढकलले आहे.
(हे पण वाचा – Operation Sindoor : भारताने दहशतावादी ऑपरेशनला का दिलं ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव?)
याआधी भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मोठा हल्ला केला होता आणि ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला होता. यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त देखील आहे. या हल्ल्याची पुष्टी खुद्द भारतीय लष्करानेच केली आहे. याशिवाय, पाकिस्तानने हल्ले स्वीकारले आहेत.
पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (पीओजेके) मधील नऊ दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर बुधवारी सकाळी जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) जोरदार गोळीबार झाला. पहलगाममधील घातक दहशतवादी हल्ल्याच्या काही दिवसांनंतर हे घडले आहे, ज्यामध्ये 26 लोक मारले गेले होते.
भारताने केलेल्या अचूक हल्ल्याच्या काही तासांनंतर, पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील भिंबर गली भागात तोफखाना गोळीबार करून युद्धबंदी कराराचे उल्लंघन केले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय सैन्य योग्य आणि संतुलित पद्धतीने प्रत्युत्तर देत आहे.