Thursday, July 9, 2026
Home Blog Page 187

दौंडमध्ये वारकऱ्यांना लुटून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोन नराधम अटकेत

0
दौंडमध्ये वारकऱ्यांना लुटून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोन नराधम अटकेत

दौंड: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली होती. पंढरपूरकडे  जाणाऱ्या वारकऱ्यांना रात्री उशिरा रस्त्यात अडवून लुटल्याची घटना समोर आली होती. तसेच त्यांच्यासोबतच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली होती. या प्रकरणात आता मोठी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना पकडलं असल्याची माहिती समोर आली आहे. मागील दिवसांपासून पुणे ग्रामीण पोलीस या नराधमांचा शोध घेत होते.

 पुणे पोलिसांना या प्रकरणात दोघांना पकडण्यात यश मिळालं आहे. अमीर पठाण आणि विकास सातपुते अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपींनी सोमवारी (दि. 30 जून 2025) रोजी पंढरपुरला देव दर्शनासाठी जात असताना वाटेत चहा प्यायला थांबलेल्या वारकऱ्यांना लुटलेलं होतं. त्याचबरोबर या नराधमांनी एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. आज दोन्ही आरोपींना बारामतीतील कोर्टात हजर करण्यात येणार आहे.सोमवारी (दि. 30 जून 2025) पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास काहीजण पुणे-सोलापूर महामार्गावरून चारचाकी वाहनाने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतानाच दौंड तालुक्यातील चिंचोली परिसरात चहा पिण्यासाठी थांबले. चहा घेतल्यानंतर सर्वजण पुन्हा कारमध्ये बसत होते. त्याचवेळी दोन अज्ञात हल्लेखोर त्याठिकाणी दुचाकीवर आले. त्यांनी काही कळायच्या आत दोघांनी सोबत आणलेली मिरचीपूड तोंडावर फेकली. यानंतर आरोपींनी महिल्याच्या अंगावरील दीड लाखांचे दागिने लुटले. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी एका अल्पवयीन मुलीच्या गळ्याला कोयता लावून तिला फरपटत परिसरातील टपरी शेजारी असलेल्या नाल्याजवळील झाडीत नेलं. याठिकाणी दोघांनीही अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. आता पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीपसिंह गिल यांनी सदर घटनेची माहिती दिली होती. हे कुटुंब पंढरपूरला निघालं होतं. यावेळी ड्रायव्हरला चहा प्यायचा असल्याने दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे गाडी थांबवण्यात आली. यावेळी दोन तरुण मोटरसायकलवरुन आले आणि त्यांनी सगळ्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून महिलांच्या अंगावर असलेलं सोनं लुटलं. कोयत्याचा धाग दाखवत आरोपींनी कुटुंबाला धमकी दिली आणि त्यांच्याकडील सर्व दागिने घेतले. तसेच त्यांच्यासोबत असणाऱ्या 17 वर्षीय मुलीचं लैंगिक शोषण देखील केलं, असं संदीपसिंह गिल यांनी सांगितलं होतं.

शाळांपेक्षा ‘अकॅडमी’चा धंदा तेजीत; पालकांकडून लाखोंची लूट!

0
शाळांपेक्षा ‘अकॅडमी’चा धंदा तेजीत; पालकांकडून लाखोंची लूट!

फलटण | साहस Times : फलटण शहरातील अनेक खासगी तसेच अनुदानित शाळांमध्ये सध्या ‘अकॅडमी संस्कृती’चे पेव फुटले असून, या अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पालकांकडून अवाजवी फी वसूल केली जात आहे. सरकारी अनुदान मिळवणाऱ्या शाळांमध्येही ही प्रथा वाढत असून, शाळा व्यवस्थापन आणि अकॅडमी चालक यांच्यातील संगनमतामुळे ही आर्थिक लूट अधिकच बळावत असल्याचा आरोप होत आहे.

विशेषतः पहिली ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मूलभूत संकल्पना नीट समजत नसतानाही, त्यांच्यावर अकॅडमीचे अतिरिक्त ओझे लादले जात आहे. शाळांमध्ये शिक्षक अध्यापनात कमी पडत असतील, तर त्यांना प्रशिक्षण देण्याऐवजी बाहेर अकॅडमी सुरू करून त्याच विद्यार्थ्यांना पुन्हा शिकवण्याचा व्याप वाढवला जात आहे.

या अकॅडमी बिनमान्यता असून, ना त्यांचा अभ्यासक्रम शैक्षणिक नियमांशी सुसंगत आहे ना सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन. त्यामुळे वर्गांमध्ये भेदभाव, मानसिक तणाव आणि शैक्षणिक गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या विरोधात कामगार संघर्ष संघटनेने आवाज उठवला असून, संघटनेचे अध्यक्ष सनी काकडे यांनी स्थानिक गट शिक्षण अधिकारी व दंडाधिकारी यांच्याकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. तसेच भारत सरकारने जाहीर केलेल्या कोचिंग क्लासेससंदर्भातील नियमांची अंमलबजावणी फलटणमध्ये होत नसल्यामुळे या बिनमान्यता अकॅडमी त्वरित बंद करण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

AIDS वर डॉक्टरांनी मिळवला विजय, रोजच्या औषधांपासून कायमची सुटका

0
AIDS वर डॉक्टरांनी मिळवला विजय, रोजच्या औषधांपासून कायमची सुटका


एचआयव्ही विषाणू निष्क्रिय करण्याच्या दिशेने शास्त्रज्ञांनी खूप मोठी झेप घेतली आहे. अमेरिकन संशोधकांनी असा एक रेणू शोधून काढला आहे जो एड्स विषाणूला बराच काळ झोपेच्या स्थितीत ठेवू शकतो. आता जीन थेरपीद्वारे हे कायमचे करणे शक्य झाले आहे. यामुळे रुग्णांना दररोजच्या औषधांपासून खूप आराम मिळेल.

जीन थेरपीची मदत

अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स मेडिसिनमधील शास्त्रज्ञांनी एका अभ्यासात म्हटले आहे की जीन थेरपीचा वापर मानवी शरीरात एड्स विषाणू निष्क्रिय करण्यासाठी प्रभावी ठरू शकतो. या शोधात विषाणू कायमचा थांबवण्याची क्षमता आहे, परंतु त्याच वेळी ते सध्या वापरल्या जाणाऱ्या अँटीरेट्रोव्हायरल औषधांच्या दुष्परिणामांपासून देखील मुक्तता प्रदान करू शकते. हे संपूर्ण संशोधन सायन्स अॅडव्हान्स मासिकात प्रकाशित झाले आहे.

व्हायरस मूळापासून होईल नष्ट

शास्त्रज्ञांनी या संशोधनात अँटीसेन्स ट्रान्सक्रिप्ट (एएसटी) नावाच्या रेणूची भूमिका देखील स्पष्ट केली आहे. हा एचआयव्हीच्या अनुवांशिक पदार्थापासून बनवला जातो आणि विषाणूला अशा स्थितीत ठेवतो जिथे तो त्याची संख्या वाढवू शकत नाही. या संशोधनाचा एक विशेष भाग एचआयव्हीशी झुंजणाऱ्या 15 लोकांवर आधारित होता. त्या रुग्णांकडून परवानगी घेतल्यानंतर, रोगप्रतिकारक पेशी गोळा करण्यात आल्या. या पेशींमध्ये एएसटी टाकण्यात आला आणि विषाणू काम करत आहेत की नाही हे पाहिले गेले. येथे देखील पूर्वीसारखेच परिणाम मिळाले ज्यामध्ये विषाणू निष्क्रिय झाला.

एआरटीचा दीर्घकाळ वापर

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जगात ३.९९ कोटी लोक एचआयव्हीने संक्रमित आहेत, त्यापैकी दरवर्षी ६.३ लाख लोकांचा मृत्यू होतो. आतापर्यंतचा मुख्य उपचार अँटीरेट्रोव्हायरल थेरपी आहे जी दररोज घ्यावी लागते. त्याचा दीर्घकाळ वापर केल्याने यकृताचे नुकसान, चयापचय विकार आणि हाडांची कमकुवतपणा यासारख्या समस्या उद्भवतात, तर जीन थेरपी पहिल्या डोसमध्येच परिणाम दर्शवते.

अशा प्रकारे शोध लावण्यात आला

संशोधकांच्या पथकाने CD4+ T पेशींमध्ये बदल करून AST चे उत्पादन वाढवले. शास्त्रज्ञांनी DNA मध्ये असे घटक घातले जे AST च्या प्रती बनवू शकतात. त्यानंतर, फ्लोरोसेंट प्रोटीन GFP च्या मदतीने, विषाणू किती वेगाने स्वतःची प्रतिकृती बनवत आहे हे मोजण्यात आले. AST च्या उपस्थितीमुळे, विषाणूची स्वतःची प्रतिकृती बनवण्याची क्षमता जवळजवळ शून्य झाली.

(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)  





Source link

मी पाकिस्तानी सैन्याचा विश्वासू एजंट होतो, तहव्वुर राणाची सर्वात मोठी कबुली

0
मी पाकिस्तानी सैन्याचा विश्वासू एजंट होतो, तहव्वुर राणाची सर्वात मोठी कबुली


मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणायाने खळबळजनक खुलासा केला आहे. NIA अर्थात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या चौकशीत त्याने पाकिस्तानी लष्कराचंही नाव घेतलं आहे. याबाबत सध्या अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. राणाला नुकतेच अमेरिकेतून प्रत्यार्पण करून भारतात आणण्यात आले.



Source link

आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात दिशाने केली पतीची हत्या, बेडवरच घेतला जीव

0
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात दिशाने केली पतीची हत्या, बेडवरच घेतला जीव


अनैतिक संबंधासाठी पतीची हत्या केल्याची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. ही घटना नागपूरमध्ये घडली आहे. एका महिलेने आपल्या प्रियकरासोबत मिळून गंभीर आजारी पतीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मात्र, महिलेने आधी पोलिसांची खूप दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र कडक चौकशीसमोर ती रडली आणि संपूर्ण सत्य समोर आले.



Source link

Serial Killer : कॅब बुक करायचा, डोंगरांवरुन फेरफटका अन्…. सीरियल किलरला 24 वर्षांनी अटक

0
Serial Killer : कॅब बुक करायचा, डोंगरांवरुन फेरफटका अन्…. सीरियल किलरला 24 वर्षांनी अटक


अगदी सिनेमाला शोभेल अशी अजय लांबाची ही कहाणी…. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने इंडिया गेट येथून एका सिरीयल किलरला अटक केली आहे. अटक केलेला सिरीयल किलर त्याच्या साथीदारांसह कॅब चालकांना मारून त्यांचे मृतदेह टेकडीवरून खड्ड्यात फेकून द्यायचा आणि त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी टाकायचा. अटक केलेल्या आरोपीचा गुन्हेगारी रेकॉर्डही समोर आला आहे. कॅब चालकाच्या हत्येप्रकरणी दोन मारेकरी तुरुंगवास भोगत आहेत. त्याच वेळी, एक अजूनही फरार आहे आणि पोलिस पथके त्याचा शोध घेत आहेत.

आरके पुरम पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अशाच एका सिरीयल किलर टोळीच्या सूत्रधाराला अटक केली आहे, जो कॅब चालकांना मारून त्यांची वाहने नेपाळमध्ये विकायचा. सिरीयल किलर आणि त्याचे तीन साथीदार प्रथम भाड्याने कॅब बुक करायचे आणि नंतर उत्तराखंडच्या डोंगरांमध्ये कॅब चालकाला बेशुद्ध करून आणि गळा दाबून त्याची हत्या करायचे. हत्येनंतर ते अल्मोडा, हल्द्वानी आणि उधम सिंह नगरच्या डोंगरावरून ड्रायव्हरचा मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी खड्ड्यात फेकून द्यायचे.

हत्या केल्यानंतर…

यानंतर, चारही मारेकरी नेपाळमध्ये कॅब विकायचे आणि पैसे आपापसात वाटून घ्यायचे. पकडलेल्या सिरीयल किलर टोळीचा मास्टरमाइंड अजय लांबा असे ओळख पटली आहे. या प्रकरणात, अजयचे दोन साथीदार धीरेंद्र आणि दिलीप पांडे यांना आधीच अटक करण्यात आली आहे, जे सध्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. टोळीतील एक सदस्य धीरज अजूनही फरार आहे, पोलिस पथके त्याचा शोध घेत आहेत.

कशी केली अटक?

या प्रकरणात आतापर्यंत चार कॅब चालकांच्या हत्येचा खुलासा झाला आहे. या टोळीने डझनभर बेपत्ता कॅब चालकांचीही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. २००१ मध्ये ही टोळी खूप सक्रिय होती. पोलिसांनी आरोपी अजयला दिल्लीतील इंडिया गेट येथून अटक केली आहे. पोलिसांपासून वाचण्यासाठी अजय १० वर्षे नेपाळमध्ये लपून बसला होता, जिथे त्याने नेपाळमधील एका मुलीशी लग्न केले. अजय लांबा आधीच दिल्लीतील ड्रग्ज प्रकरणात आणि ओरिसातील एका मोठ्या दरोड्याच्या प्रकरणात तुरुंगात गेला आहे. कॅब ड्रायव्हर्सच्या हत्या प्रकरणाशी संबंधित प्रश्नांवर पोलिसांनी आरोपी अजयची चौकशी सुरू केली आहे. 





Source link

लघवी करताना बुडबुडे दिसतात? मग धोक्याची घंटा; ‘या’ मोठ्या आजाराचे लक्षण

0
लघवी करताना बुडबुडे दिसतात? मग धोक्याची घंटा; ‘या’ मोठ्या आजाराचे लक्षण


Foamy Urine Causes and Symptoms : कुठल्याही आजाराचे पहिले संकेत आपल्याला लघवीचा रंग सांगतो. डॉक्टरदेखील यूरिन टेस्ट करुन आजार सांगतात. जर तुम्हाला लघवी करताना त्यात फेस किंवा बुडबुडे दिसत असेल तर हे सामान्य गोष्ट नाही. तुमच्या लघवीमध्ये फेस दिसल्यास हे मोठ्या आजाराचे लक्षण आहे. तुम्हाला वारंवार लघवीमध्ये फेस दिसत असेल तर लगेचच डॉक्टरांकडे जा. 

लघवीतून फेस येण्याची लक्षणं…

– हात, पाय, चेहरा आणि पोटावर सूज, हे किडनी डॅमेज झाल्याचे संकेत असू शकतात.

– थकवा

– भूक कमी लागणे

– मळमळ

– उलटी

– झोपेची समस्या

– लघवी कमी तयार होणे

– जर तुम्ही पुरूष असाल तर ऑर्गॅज्मवेळी सीमन फार कमी किंवा अजिबातच न येणे

– जर तुम्ही पुरूष असाल तर इंफर्टिलिटीची समस्या होणे

मूत्रपिंडाच्या समस्या 

लघवीमध्ये फेस येणे हे किडनीच्या जळजळीचे किंवा किडनीशी संबंधित समस्येचे मोठं लक्षण असतात. जेव्हा किडनी व्यवस्थित काम करत नाही तेव्हा लघवीमध्ये प्रथिने दिसतात, वैद्यकीय भाषेत त्याला प्रोटीन्युरिया म्हणतात. 

मधुमेह

लघवीमध्ये बुडबुडे येणे हे शरीरातील साखरेची पातळी वाढल्याचे लक्षण असण्याची शक्यता आहे. कधीकधी लघवीमध्ये बुडबुडे येणे सामान्य असू शकतं. पण दररोज लघवीमध्ये फेस येणे सामान्य नसतं. जर बराच काळ लघवीमध्ये फेस येण्याची समस्या असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, ते मधुमेहाचे लक्षण असण्याची शक्यता आहे. 

प्रोटीन्युरिया

जर लघवीमध्ये बुडबुडे किंवा फेस बराच काळ दिसत असेल तर ते प्रोटीन्युरियाची समस्या असू शकते. या स्थितीत शरीर आवश्यकतेपेक्षा जास्त प्रथिने उत्सर्जित करण्यास सुरुवात करते. खरं तर, जेव्हा मूत्रपिंड योग्यरित्या काम करत नाही तेव्हा प्रथिने मूत्रात जाऊ लागतात. 

आयुर्वेदिक उपाय

धण्याचं पाणी

धण्याचं पाणी सेवन केल्याने लघवीसंबंधी अनेक समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरु शकतं. लघवीतून फेस येणे किंवा जास्त वास येणे यावर तुम्ही मात करु शकता. या पाण्याच्या सेवनाने यूटीआयची समस्या दूर होण्यासदेखील फायदा मिळतो. धण्याचं पाणी तयार करण्यासाठी एक कप पाण्यात एक चमचा धणे टाकून उकडून घ्या. त्यानंतर पाणी कोमट झाल्यावर गाळून त्याचं सेवन करा. दिवसातून दोन वेळा या पाणी प्या. 

आल्याचं पाणी

आल्याचं पाणी पिऊनही तुम्ही लघवीतील दुर्गंधी आणि फेस दूर करू शकता. यासाठी अर्धा तुकडा आले घ्या आणि एक कप पाण्यात ते उकडा. पाणी कोमट झाल्यावर चहासारखं थोडं थोडं सेवन करा.

ब्लूबेरी ज्यूस

लघवीमधून फेस किंवा दुर्गंधी येत असेल तर तुम्ही ब्लूबेरीचा ज्यूस सेवन केला पाहिजे. यूटीआय इन्फेक्शन, लघवीतून वास, ब्लॅडरमधील इन्फेक्शन इत्यादी समस्या या ज्यूसने दूर होतात. एक कप ब्लूबेरी ज्यूस दिवसातून दोन वेळा सेवन करा.

(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)  





Source link

रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली फलटणमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची एकजूट; बैठकीत संघटन बळकट करण्याचा निर्धार

0
रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली फलटणमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची एकजूट; बैठकीत संघटन बळकट करण्याचा निर्धार

फलटण | साहस Times प्रतिनिधी :- सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली फलटण तालुका व शहर काँग्रेस कमिटीची आढावा बैठक आज उत्साहात पार पडली. बैठकीत काँग्रेसच्या संघटनात्मक मजबुतीवर भर देत आगामी निवडणुकांची रणनीती ठरवण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र (भैय्या) सूर्यवंशी बेडके व शहर काँग्रेस अध्यक्ष पंकज पवार यांच्या उपस्थितीत नवनियुक्त जिल्हाध्यक्ष रणजित भैय्यांचा तालुका व शहर काँग्रेसतर्फे सत्कार करण्यात आला.

या बैठकीत हणमंत लोंढे (बरड) आणि दशरथ जाधव (ढवळ) यांनी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष श्री. देशमुख यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना पक्षकार्याची दिशा दिली.

तालुका काँग्रेस अध्यक्ष सूर्यवंशी यांनी फलटण तालुक्यातील जनतेसाठी शासकीय पातळीवर काँग्रेसतर्फे सातत्याने होत असलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. ते म्हणाले की, “आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस सर्व जागा ताकदीनिशी लढवणार आहे.”

जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना उद्देशून सांगितले की, “आपण जिल्ह्याभरात दौरे करत असून जुने-नवे कार्यकर्ते एकत्र आणून काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देणार आहोत. जनतेच्या प्रश्नांसाठी आता रस्त्यावर उतरून लढण्याची वेळ आली आहे.” त्यांनी फलटण काँग्रेस कार्यकर्त्यांना पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीस जिल्हा सरचिटणीस शंकरराव लोखंडे, सुनील नेटके, युवक काँग्रेस शहराध्यक्ष प्रीतम जगदाळे, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष ताजुद्दीन बागवान, शहराध्यक्ष अल्ताफ पठाण, सेवा दलाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे, युवक काँग्रेसचे सरचिटणीस गंगाराम रणदिवे, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष विकास ननवरे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यामध्ये मनोहर गायकवाड, बाल मुकुंद भट्टड, अमरसिंह बेडके, निळकंठ निंबाळकर, आर. पी. भोसले, अच्युत माने, सोहराब खान, अभिजीत जगताप, हरीश बेडके, अमित फाळके, चैतन्य पवार, खान मिटकरी, अजय बेडके, दिलीप आवारे, यजुवेंद्र घोरपडे, अतुल कोकणे, भारत अहीवळे, अजय इंगळे, अभिलाष शिंदे, सुधीर शिंदे, धनंजय गोरे, प्रवीण अडसूळ, संतोष बोबडे, संतोष बाचल यांचा देखील सहभाग होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर काँग्रेस अध्यक्ष पंकज पवार यांनी केले, तर युवक काँग्रेस शहराध्यक्ष प्रीतम जगदाळे यांनी आभार मानले.

खोट्या तक्रारीने पुणे शहरात खळबळ; पोलीस तपासात उघड झाली तरुणीची बनावट कथा

0
खोट्या तक्रारीने पुणे शहरात खळबळ; पोलीस तपासात उघड झाली तरुणीची बनावट कथा

पुणे | ६ जुलै २०२५. कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या तरुणीने कुरीयर बॉयने तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक तक्रार दाखल केली होती. मात्र पोलीस तपासानंतर ही संपूर्ण तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न झाले असून, खोट्या तक्रारीमुळे पोलिस यंत्रणेला मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.

२ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास, तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत सांगितले होते की, एका कुरीयर बॉयने तिच्या घरात जबरदस्ती घुसून स्प्रे फवारून तिला बेशुद्ध करत अत्याचार केला. या तक्रारीनंतर पुणे शहरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी तत्काळ २० पथकांची नियुक्ती करत कसून तपास सुरू केला.

मात्र तपासात मोठा ट्विस्ट समोर आला. पोलिसांनी संशयित तरुण आणि तक्रार करणाऱ्या तरुणीची समोरासमोर चौकशी केली असता, संबंधित तरुण तिचा ओळखीचा असून, त्यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वैयक्तिक संबंध असल्याचे स्पष्ट झाले. इतकंच नव्हे तर, तरुणीनेच स्वतः त्याला घरी बोलावल्याची माहिती समोर आली.

तक्रारीत उल्लेख केलेला कोणताही स्प्रे वापरण्यात आल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. याशिवाय, तिने सोशल मीडियावर अ‍ॅप वापरून फोटो एडिट करून “मी पुन्हा येईन” असा मजकूर टाकल्याचेही तपासात उघड झाले.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “या संपूर्ण प्रकरणात तरुणीने खोटी तक्रार दाखल करत पोलिसांची फसवणूक केली असून, केवळ वैयक्तिक रागातून ही संपूर्ण कथा तिने बनवली.” या प्रकारामुळे पोलिस यंत्रणेला अनावश्यक त्रास सहन करावा लागला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, संशयित तरुणाला नोटीस देऊन सोडण्यात आले असून, त्याला पुढील चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. आता या खोट्या तक्रारीसंदर्भात संबंधित तरुणीवर काय कारवाई केली जाते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

अजितदादांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड; माळेगाव साखर कारखान्याच्या कामकाजाला दिला वेग

0
अजितदादांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड; माळेगाव साखर कारखान्याच्या कामकाजाला दिला वेग


माळेगाव | ६ जुलै २०२५. :- राज्याच्या राजकारणात वजनदार मानल्या जाणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. निवड होताच अजितदादांनी कोणताही वेळ न दवडता कारखान्याच्या कामकाजाचा आढावा घेऊन आपल्या कार्यशैलीची झलक दाखवली.

दुपारी तीन वाजता अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड झाली. त्यानंतर सलग पाच तास त्यांनी संचालक मंडळ, अधिकारी वर्ग व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्यांशी बैठका घेतल्या. कारखान्याच्या सध्याच्या घडीतील स्थितीचा सखोल आढावा घेत आगामी पाच वर्षांसाठी व्यापक दृष्टिकोन स्पष्ट केला.

“येणाऱ्या पाच वर्षात कारखान्याचा चेहरामोहरा बदलायचा आहे. सभासदांना अधिकचा ऊसदर मिळावा यासाठी प्रयत्न करायचे आहेत. कुणी चुकीचं वागल्यास हयगय केली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा देत त्यांनी शिस्तबद्ध आणि जबाबदारीने काम करण्याच्या सूचना दिल्या.

कारखाना हा सभासदांचा असून त्यांचा सन्मान राखत त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी संचालक व कर्मचारीवर्गाने कटिबद्ध राहावे, असं आवाहन त्यांनी केलं. “नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उस आणि साखर उत्पादनात वाढ करणार असून कारखान्याचा दर्जा संपूर्ण महाराष्ट्रात उंचावायचा आहे,” असा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.

कारभाराचा प्रारंभ करताच अजितदादांनी कामकाजाला गती देत जबाबदारीची जाण दाखवली असून, त्यांच्या नेतृत्वात माळेगाव कारखाना एका नव्या वाटचालीकडे वळेल, असा विश्वास सभासदांमध्ये व्यक्त होत आहे.