Saturday, July 4, 2026
Home Blog Page 104

जीवनमार्ग: आचरण असे असावे की ते‎मुलांसाठी संस्कार बनेल‎

0
जीवनमार्ग:  आचरण असे असावे की ते‎मुलांसाठी संस्कार बनेल‎


पं. विजयशंकर मेहता8 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

बीएसएफचे घोषवाक्य //”फर्स्ट लाइन ऑफ डिफेन्स’ आहे. मुलांसाठी‎हेच संस्काराचे तत्वज्ञान ​​बनते. आता मुलांसाठी संस्कार हीच फर्स्ट‎लाइन ऑफ डिफेन्स असावी. जगात यशस्वी दिसणाऱ्यांनी ते जादूने‎साध्य केलेले नाही. त्यांनी वारंवार प्रयत्न केले आहेत. त्यांच्या‎निर्णयांत दृढता राखली आहे. पूर्ण समर्पण, कठोर परिश्रमाने काम केले‎आहे. सध्या हे संस्कार आहेत. आपली मुले यशस्वी होतील तेव्हा जग‎त्यांचे यश पाहील. परंतु त्यांना त्यामागील मूल्ये दिसणार नाहीत.‎आपणही घरी फक्त बोलून आणि समजावून सांगून आपल्या मुलांना‎मूल्ये शिकवू नयेत. संस्कार शिकवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे‎आचरण. कुटुंबातील सदस्यांचे वर्तन असे असले पाहिजे की ते‎मुलांसाठी संस्कृती बनतील. आपण त्यांना विनासंस्कार यशाचे रहस्य‎शिकवले तर आपली आणि आपल्या मुलांची इच्छाशक्ती थकून‎जाईल. संपूर्ण कुटुंब थकून जाईल. आज लोक मुलांचे संगोपन‎करण्यात अधिकाधिक निराश होतात. याला एक आव्हान समजा,‎समस्या नाही. त्यावर उपाय म्हणजे योग्य वेळी योग्य संस्कार रुजवणे‎ होय



Source link

फलटणमध्ये तरुण नेतृत्व सनी (भैय्या) अहिवळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश; राजे गटाला मोठा धक्का

0
फलटणमध्ये तरुण नेतृत्व सनी (भैय्या) अहिवळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश; राजे गटाला मोठा धक्का

फलटण | स्थानिक राजकारणाला नवा कलाटणी देणारी घटना आज फलटण शहरात घडली आहे. नगरपरिषदेचे माजी नगरसेवक आणि प्रभाग क्रमांक २ चे लोकप्रिय तरुण नेते सनी (भैय्या) अहिवळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. आमदार सचिन पाटील आणि सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी बोलताना आमदार सचिन पाटील म्हणाले की, “फलटण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दमदार कामकाज करीत आहे. येणाऱ्या काळात सनी अहिवळे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक २ मधील विविध प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू.”

त्याचवेळी श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी सांगितले की, “संपूर्ण फलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी आम्ही अजित पवार आणि आमदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. सनी (भैय्या) यांच्या रूपाने राष्ट्रवादीला शहरात एक खंबीर युवा नेतृत्व मिळाले असून त्यांचा यथोचित सन्मान राखण्याचे काम राष्ट्रवादी नक्की करेल.”

दरम्यान, युवा नेते सनी अहिवळे यांच्या या ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पक्षप्रवेशामुळे फलटण शहरातील राजे गटाला मोठा धक्का बसला असल्याचे मानले जात आहे. या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक २ मधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आगामी काळात सनी अहिवळे यांच्या नेतृत्वामुळे राजे गटातील संभाव्य गळती कोण रोखणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

एका झटक्यात मुंबईच्या राजकारणाची दिशा फिरली! ठाकरेंची सेना, शिवसेना आणि भाजपच्या माजी नगरसेवकांना आरक्षण जाहीर झाल्यामुळे बसणार धक्का!

0
एका झटक्यात मुंबईच्या राजकारणाची दिशा फिरली! ठाकरेंची सेना, शिवसेना आणि भाजपच्या माजी नगरसेवकांना आरक्षण जाहीर झाल्यामुळे बसणार धक्का!


Mumbai Municipal Corporation Bmc Election 2025 Ward Reservation : मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. दरम्यान यानंतर आजी-माजी दिग्गज नगरसेवकांना मोठा फटका बसलाय.. पालिकेकडून काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतमध्ये
महिलांसाठी 50 टक्के म्हणजेच 114 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. महिला आरक्षणात जागा गमावलेल्या उमेदवारांना सर्वसाधारण जागेवरुन निवडणूक लढवावी लागणार आहे.

Add Zee News as a Preferred Source

महायुती आणि मविआतील अनेक दिग्गज नेत्यांच्या वॉर्ड आरक्षीत असल्यामुळे मोठा धक्का बसलाय. त्यामुळे मविआ आणि महायुती या वॉर्डमध्ये कोणत्या नवीन उमेदवारांना संधी मिळणार.  तसंच दिग्गज नेत्यांसाठी पक्ष नवीन कोणती उपाययोजना करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबईत कोणत्या दिग्गज नेत्यांचे वॉर्ड आरक्षित

माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांना आरक्षण सोडतीचा फटका, वार्ड क्रमांक 1 ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित

किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या यांचा वार्ड 108 ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित 

कप्तान मलिक यांचा वॉर्ड क्रमांक 170 हा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव

माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा वार्ड क्रमांक 176 ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित

मिलिंद वैद्य यांचा वॉर्ड क्रमांक 182 हा ओबीसी वर्गासाठी राखीव

विशाखा राऊत यांचा वॉर्ड क्रमांक 191 यंदा ओबीसी महिला वर्गासाठी
राखीव

स्नेहल आंबेकर यांचा वार्ड क्रमांक 1998 ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित 

माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि शिंदे गटाचे नेते यशवंत जाधव यांना धक्का, यशवंत जाधव यांचा वार्ड क्रमांक 209 महिला ओपनसाठी आरक्षित

ठाकरेंची सेना, शिवसेना आणि भाजपच्या कोणकोणत्या माजी नगरसेवकांना आरक्षण सोडतीचा फटका 

तेजस्वी घोसाळकर -प्रभाग क्रमांक – 1
ओबीसी महिला आरक्षित

– सदा परब- प्रभाग क्रमांक – 88 
सर्वसाधारण महिला आरक्षित

– हाजी मोहम्मद हलीम खान- प्रभाग क्रमांक 96
सर्वसाधारण महिला आरक्षित

– रमेश कोरगावकर -प्रभाग क्रमांक  114
सर्वसाधारण महिला आरक्षित 

– सुरेश पाटील-  प्रभाग क्रमांक 127
 सर्वसाधारण महिला आरक्षित 

मिलिंद वैद्य प्रभाग क्रमांक 182
ओबीसी आरक्षित

वसंत नकाशे – प्रभाग क्रमांक 186 
एससी महिला आरक्षित

आशिष चेंबूरकर – प्रभाग क्रमांक 196 
सर्वसाधारण महिला आरक्षित 

शिवसेनेला आरक्षण सोडतीचा फटका

चंद्रवती मोरे -प्रभाग क्रमांक 121
एसटी महिला आरक्षित 

परमेश्वर कदम – प्रभाग क्रमांक 133
एससी महिला आरक्षित 

अख्तर कुरेशी – प्रभाग क्रमांक 139
 सर्वसाधारण महिला आरक्षित 

मंगेश सातमकर- प्रभाग क्रमांक 175 
 सर्वसाधारण महिला आरक्षित

दत्ता नरवणकर – प्रभाग क्रमांक 197
सर्वसाधारण महिला आरक्षित

यशवंत जाधव -प्रभाग क्रमांक 209 
सर्वसाधारण महिला आरक्षित 

गीता सिंगण – प्रभाग क्रमांक 12 
ओबीसी महिला आरक्षित 

उपेंद्र सावंत- प्रभाग क्रमांक 118  
एससी महिला आरक्षित

संतोष खरात- प्रभाग क्रमांक 195
ओबीसी आरक्षित 

भाजपला आरक्षण सोडतीचा फटका 

मकरंद नार्वेकर  – प्रभाग क्रमांक 227 
 सर्वसाधारण महिला आरक्षित 

रवी राजा – प्रभाग क्रमांक 176
ओबीसी महिला आरक्षित 

नील सोमय्या – प्रभाग क्रमांक 108 
ओबीसी महिला आरक्षित 

अभिजीत सामंत – प्रभाग क्रमांक 84 
 सर्वसाधारण महिला आरक्षित

अतुल शहा -प्रभाग क्रमांक 220
सर्वसाधारण महिला आरक्षित 

 ज्योती आळवणी – प्रभाग क्रमांक 85
 ओबीसी आरक्षित





Source link

तुमचीही सारखी झोपमोड होतेय? ही सवय तुमच्या हृदयासाठी ठरु शकते घातक

0
तुमचीही सारखी झोपमोड होतेय? ही सवय तुमच्या हृदयासाठी ठरु शकते घातक


हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळे व्यस्त वेळापत्रक, वाढता ताणतणाव आणि कॅफिन किंवा अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे अनेक लोकांना त्यांच्या झोपेच्या दिनचर्येशी तडजोड करावी लागते. रात्री अचानक जाग येणे अथवा झोपेत व्यत्यय येणे हे तुमच्या हृदयावर वाईट परिणाम करू शकते. जरी एकुण तास मोजल्यास ते पुरेसे वाटत असले तरी, योग्य दर्जाची झोप न मिळाल्याने एखाद्याच्या हृदयावर ताण येऊ शकतो. झोपेच्या दरम्यान, शारीरीक हलचाल मंदावते, रक्तदाब कमी होतो आणि हृदयाला विश्रांती मिळते.

Add Zee News as a Preferred Source

जेव्हा या विश्रांती प्रक्रियेत अडचण येते तेव्हा मज्जासंस्था सतर्क राहते आणि कॉर्टिसोल आणि अ‍ॅड्रेनालाईन सारखे तणाव संप्रेरक जास्त प्रमाणात स्रवतात. कालांतराने यामुळे उच्च रक्तदाब, हृदयाची गती वाढणे आणि जळजळ होते जे ऱ्हदयाच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतात आणि हृदयरोगाची होण्याची शक्यता वाढते. विविध अभ्यासांनी हे सिद्ध केले आहे की स्लीप एपनिया किंवा निद्रानाश असलेल्या लोकांना झोपेची समस्या उद्भवते (सतत झोपमोड होणे किंवा सलग झोप न मिळणे) , त्यांना उच्च रक्तदाब, एरिथमिया, स्ट्रोक आणि अगदी हार्ट फेल्युअरचा धोका वाढतो.

शांत झोप न मिळण्याची सामान्य कारणे म्हणजे तणाव, चिंता, झोपेच्या वाईट सवयी, वाढता स्क्रीन टाईम, रात्री उशिरा कॅफिनयुक्त पदार्थांचे  सेवन किंवा अ‍ॅसिड रिफ्लक्स आणि स्लीप एपनिया सारख्या वैद्यकीय समस्या. यामुळे सकाळच्या वेळी डोकेदुखी, दिवसा थकवा, मूड स्विंग किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण यासारख्या इतर लक्षणं झोपेच्या पद्धतींमध्ये व्यत्यय आणतात.

या महत्त्वाच्या टिप्स फॉलो करा:

प्रत्येकाने योग्य दिनचर्येचे पालन करून रात्रीच्या वेळी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. आठवड्याच्या शेवटीही झोपेच्या आणि उठण्याच्या वेळा पाळाव्यात. त्याचप्रमाणे झोपण्यापूर्वी कॅफिन आणि अल्कोहोलचे सेवन टाळणे, स्क्रीन टाईम मर्यादित करणे आणि दिर्घ श्वास घेणे किंवा मेडिटेशन करणे यासारख्या विश्रांती तंत्रांचा सराव केल्यास झोपेची गुणवत्ता सुधारू शकते. झोप येण्यासाठी गरम पाण्याने आंघोळ करणे, वाचन करणे किंवा सौम्य संगीत ऐकु शकतात. ज्या व्यक्ती जास्त घोरतात किंवा श्वास घेण्यासाठी झोपेतून उठतात त्यांनी स्लीप एपनियासारख्या झोपेच्या विकारांसाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि वेळीच उपचार सुरू करावेत.

प्रत्येकाने झोपेला प्राधान्य देणे आणि हृदय आरोग्य चांगले राखणे गरजेचे आहे. झोपमोड होणे हे कालांतराने तुमच्या हृदयाला कमी तास झोपण्यापेक्षाही जास्त हानी पोहोचवते, त्यामुळे जास्तीत जास्त ८ तास चांगल्या दर्जाची झोप घेणे गरजेचे आहे.





Source link

जनतेच्या मनातून उमटलेला आवाज – “आपल्या हक्काची उमेदवार” म्हणून रेहाना बशीर मोमीन प्रभाग क्र. 10 मधून रिंगणात!

0
जनतेच्या मनातून उमटलेला आवाज – “आपल्या हक्काची उमेदवार” म्हणून रेहाना बशीर मोमीन प्रभाग क्र. 10 मधून रिंगणात!

फलटण प्रतिनिधी :- फलटण शहराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्य स्थापनेत मोठे योगदान दिले असून, त्या परंपरेचा वारसा आजही इथल्या जनतेत दिसून येतो. या सामाजिक व ऐतिहासिक वारशाला पुढे नेत, समाजकारणाला प्राधान्य देत मोमीन कुटुंबीयांनी नेहमीच जनतेच्या सुखदुःखात एक पाऊल पुढे येऊन सेवा बजावली आहे.

युवानेते बबलू शेठ मोमीन यांनी फलटण शहरात समाजकारणाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गेली पंधरा वर्षे सामाजिक व राजकीय बांधिलकी जोपासली जात आहे. याच पार्श्वभूमीवर, होणाऱ्या फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत श्रीमती रेहाना बशीर मोमीन यांना प्रभाग क्र. 10 मधून प्रतिनिधित्व करावे, असा जनतेकडून प्रबळ आग्रह व्यक्त करण्यात आला आहे.

मोमीन कुटुंबीयांनी तीन पिढ्यांपासून जनतेची सेवा केली आहे. सामाजिक वारसा म्हणजे केवळ परंपरा आणि संस्कृती नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाचा विकास घडविण्याचा एक वसा असतो. हा वारसा पुढे नेत, रेहाना मोमीन समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत.

त्यांच्या उमेदवारीमागे माढा लोकसभेचे पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील तसेच पालिकेचे माजी विरोधी पक्षनेता समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे मार्गदर्शन आहे.

जनतेचा विश्वास, समाजाचा पाठिंबा आणि विकासाचा संकल्प — या त्रिसूत्रीवर आधारलेली ही उमेदवारी प्रभाग क्र. 10 साठी विकासाचा रोडमॅप ठरणार असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.

जनतेच्या मनातून आलेली ही उमेदवारी नक्कीच जनतेच्याच विजयात परिवर्तित होईल, अशी खात्री व्यक्त केली जात आहे.

फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही

0
फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही

फलटण, दि. १० नोव्हेंबर – तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (सोमवार) पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी प्रशासक निखिल जाधव यांनी दिली.

यंदाच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पद सर्वसाधारण असून एकूण १३ प्रभागांमध्ये २७ नगरसेवक जागा आहेत. यापैकी १४ महिला व १३ पुरुषांसाठी राखीव जागा आहेत.

पहिल्या दिवशी उमेदवारी दाखल न झाल्याने निवडणूक विभागात शांतता होती. तथापि, अनेक नागरिक कर भरणा, शौचालय दाखला आदी कामांसाठी पालिकेत दाखल झाले होते. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार उमेदवारांना ऑनलाईन फॉर्म भरून त्याची प्रत निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करणे आवश्यक आहे.

दरम्यान, फलटणमध्ये नगराध्यक्ष पदासाठी बहुरंगी लढतीचे चित्र दिसत आहे. विशेषतः प्रभाग १, ४, ५, १२ आणि १३ मध्ये चुरशीच्या लढती अपेक्षित आहेत. उमेदवारी मिळवण्यासाठी तसेच पक्षांतराच्या हालचालींना वेग आला असून, खरी लढत ‘खासदार गट विरुद्ध राजे गट’ अशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र दोन्ही गटांनी आपापल्या चिन्हावर लढायचे की आघाडी करून, हे अजून स्पष्ट झालेले नाही.

नगरसेवक पदासाठी २७ जागांसाठी शंभरहून अधिक उमेदवारी अर्ज दाखल होतील, असा अंदाज निवडणूक विभागाने व्यक्त केला आहे. तसेच नगराध्यक्ष पदासाठी किमान पाच उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता आहे. आगामी काही दिवसांत अर्ज दाखल प्रक्रियेला वेग येईल, अशी अपेक्षा आहे.

📅 फलटण नगरपरिषद निवडणूक २०२५
📍 १३ प्रभाग | २७ नगरसेवक जागा | थेट नगराध्यक्ष निवडणूक
🗳️ पहिल्या दिवशी: शून्य अर्ज

शेतकरी आत्महत्या कशा टळतील?: कर्जमाफी द्या, पण 17 लाख सरकारी पगारदार, 1 कोटी आयकर भरणारे वगळा, वाचा अमर हबीबांचा लेख

0
शेतकरी आत्महत्या कशा टळतील?:  कर्जमाफी द्या, पण 17 लाख सरकारी पगारदार, 1 कोटी आयकर भरणारे वगळा, वाचा अमर हबीबांचा लेख


  • Marathi News
  • Opinion
  • Farmer Loan Waiver Exclusion Demanded: Govt Employees, IT Payers Out | Amar Habib Statement

अमर हबीब6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

२०१७ ला शेतकऱ्यांचा संप झाला होता. संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाचे लोन पसरले होते. त्या वेळी मी पहिल्यांदा जाहीर भूमिका घेतली होती की, सरकारी पगारदार आणि आयकर भरणारे याना कर्ज-बेबाकी देऊ नये. अशा घटकांना कर्ज-बेबाकी देणे हा तिजोरीवर दरोडा आहे. त्यांना दिले जाणारे पैसे शेतकऱ्यांना द्या. त्या वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होते. त्यांनी माझ्या म्हणण्यातील तत्व मान्य केले पण केवळ हे दोन घटक न धरता त्यांनी लांबलचक यादी जोडली व वगळलेल्यांचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाहीत. त्यामुळे त्या निर्णयाच्या विरोधात आक्रोश निर्माण झाला.

का वगळावे?

मी तालुक्याच्या गावात राहतो. महसूलमधील एका मित्राने सांगितले की, गेल्या दोन वर्षांत आमच्या गावातील पाच डॉक्टरांनी सुमारे दोनशे एकर जमीन विकत घेतली. शेतीच्या उत्पन्नावर आयकर नाही म्हणून अशी तजवीज केली जाते. शिवाय रियल इस्टेट म्हणूनही जमीन हे महत्त्वाचे कलम आहे. तुमच्या भागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांकडे किती जमीन आहे ते पाहा. नदीच्या काठच्या जमिनी असो की शिवारात हिरवी कांच दिसणारी शेती पुष्कळदा अशा भ्रष्ट लोकांची असते. हे गौडबंगाल लक्षात येईल.

जिल्ह्याच्या ‘एमआयडीसी’मध्ये उद्योग असलेले एक कारखानदार सांगत होते की, ‘आमच्या मॉर्निंग ग्रुपमध्ये काही कारखानदार आहेत, काही डॉक्टर आहेत, काही अधिकारी आहेत तर एक जण साखर कारखान्याचे चेअरमनही आहेत. हल्ली आमच्याकडे ‘कोणाला किती पैसे आले?’ यावरच चर्चा होते. कोणी म्हणते, दोन लाख आले, कोणी म्हणते ८० हजार आले.’ ते पुढे म्हणाले, ‘अशी मदत घेण्याची मला लाज वाटते. आमच्या सारख्यांना का पैसे देता? जे खरे गरजवंत आहेत त्यांना द्या.’ त्यांचे म्हणणे एका प्रामाणिक कारखानदाराचे आहे. मागे हाय कोर्टातील वकील महेश भोसले यांनी मला कर्ज माफी नको, असे जाहीर केले होते.

सरकारी पगार घेणारी व्यक्ती दुसरा व्यावसाय करू शकत नाही. असा कायदा आहे. म्हणून त्याला दुकान काढता येत नाही, गिरणी चालवता येत नाही. पुस्तक प्रकाशन करून विकता येत नाही, म्हणून अनेक सरकारी पगारदार लोक प्रकाशक म्हणून बायकोचे किंवा आईचे नाव टाकतात. माझा मुद्दा त्यांनी काय करावे हा नाही. माझे म्हणणे एवढेच आहे की ते जर इतर व्यावसाय करू शकत नाहीत, तर ते शेती कशी करतात? शेती हा व्यवसाय नाही का? शेती वंश-परंपरेने आली म्हणून काय झाले? वंश-परंपरेने आलेली शेती करायची असेल तर मग नोकरी का करता? नोकरी करायची असेल तर शेती का? ही सूट कोणी दिली? का दिली? बरे त्यावर ह्यांना कर्जमाफी आणि अनुदानेही हवीत. वेतन आयोगही घेणार आणि शेतकरी म्हणून दुहेरी लाभ ही उपटणार. हे कसे चालेल?

सरकार कारखानदारांचे लाखो कोटींचे कर्ज राइट ऑफ करते मग शेतकऱ्यांमध्ये भेदाभेद का? असा प्रश्न विचारला जातो. मी या प्रश्ना मागची भावना समजू शकतो. असा प्रश्न विचारणारा प्राध्यापक असेल तर लक्षात घ्या, त्याना दोन गोष्टी माहित नाहीत. एक तर सगळ्या कारखानदारांची थकबाकी राइट ऑफ केली जात नाही. सरकारच्या खास मर्जीतील निवडक कारखानदारांचीच थकबाकी राइट ऑफ केली जाते. तेथेही सरसकट नसते. बगलबच्च्यांची कर्जे राइट ऑफ करणे ही बाब मला जास्त गंभीर वाटते. सरकारने केलेला हा पक्षपात घतक आहे. मुठभर कारखानदारांना मार्ग मोकळा करणे देशाच्या हिताचे असणार नाही.

दुसरी बाब ‘शेतकरी तितुका एक एक’ म्हणजे ‘शेतकरी’ तितुका एक एक. बिगर शेतकरी आणि शेतकरी तितुका एक एक नव्हे. यासाठी तुम्हाला शेतकरी या शब्दाची व्याख्या समजावून घ्यावी लागेल. सातबारा आहे म्हणून त्याला शेतकरी म्हणायचे का? असे केले तर अनेक पुढारीच काय दारूचे गुत्तेवाले देखील त्या व्याख्येत येतील. शेतकरी या शब्दाची व्याख्या साधी आहे. ज्याच्या उत्पन्नाचे साधन शेती आहे, तो शेतकरी. शेतकरी तितुका एक एक म्हणजे ज्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती आहे ते सगळे एक आहेत. त्यात मजूर, बटाईदार, संत्र्याचा- कापसाचा, बागाईतदार- कोरडवाहू, मराठवाड्यातला, पश्चिम महाराष्ट्रातला, ह्या जातीचा, त्या जातीचा- ह्या धर्माचा- त्या धर्माचा असा भेदाभेद करू नका. ज्यांचे ज्यांचे शेती हे मुख्य उत्पन्नाचे साधन आहे ते सगळे शेतकरी होत. ज्याना सरकारी पगार मिळतो, ज्याना इतर व्यवसायातून उत्पन्न मिळते, जे राजकारणात कमाई करतात ते कसे शेतकरी होतील.

काहींचे म्हणणे असे की, शेती तोट्यात आहे, ती कोणाचीही असली तरी तोट्यात आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे तोट्यात आहे. पगारदार असो की व्यावसायिक त्यांना सरकारने नुकसान भरपाई दिली पाहिजे. ह्या मित्रांनी हे लक्षात घ्यावे की, नोकरदारांना पगार मिळतो, आयकर भरणारे लोक काही कमी कमवत नाहीत, आपली कमाई लपवण्यासाठी ते जमिनी ठेवतात किंवा विकत घेतात. माझा मुद्दा हा आहे की, शेतीच्या लुटीचा मोबदला त्यांना त्यांच्या व्यावसाय आणि नोकरीत मिळतो. त्यामुळे त्यांना तक्रार करायला जागा नाही.

सोपा मार्ग

सरकारी पगारदार आणि आयकर भरणारे यांना वगळणे अवघड नाही. त्यांची यादी करायला घरोघर जाण्याची आवश्यकता नाही. या दोन्ही याद्या काही तासात सरकारला मिळू शकतात. जास्ती जास्त आठ दिवस लागतील. सरकारी पगारदारांची यादी खुद्द सरकारकडे असणारच आहे. आयकर भरणाऱ्यांची यादी देखील महाराष्ट्रातील आयकर खात्याच्या वेबसाइटवर मिळू शकते. फक्त हेच दोन घटक सुरुवातीला वगळले पाहिजेत. माझ्या माहितीनुसार सरकारी कर्मचार्‍यांची संख्या 17 लाख आहे व आयकर भरणाऱ्यांची संख्या जवळपास एक कोटी आहे. या एक कोटीमध्ये सरकारी कर्मचारी समाविष्ट असणार आहेत. ही यादी एकत्र आली की त्या पैकी किती जनांच्या नावे सातबारा आहे, हे सहज काढता येईल.

आता सात-बारा देखील ऑनलाइन उपलब्ध आहे. एका बाजूला राज्य पातळीवर ही माहिती तयार करावी दुसऱ्या बाजूला महसूल कर्मचार्‍याकडून माहिती मागवून घ्यावी. आयकर भरणाऱ्यांची यादी स्थानिक महसूल यंत्रणेकडे देऊन त्यात्या नावा वरील क्षेत्र कळू शकेल. सरकारने ठरवले तर ही माहिती आठ दिवसात गोळा होईल. वरील यादीत अनेक असे कर्मचारी आणि आयकर भरणारे लोक असतील की ज्यांच्या नावाने जमीन असणार नाही. हा आकडा किती असले हे आज नक्की सांगता येत नाही.

कर्जबेबाकी सोबत मदतही करा

शेती हे मुख्य उत्पन्नाचे साधन असणारे किती कुटुंब महाराष्ट्रात असतील? याचा नेमका आकडा सरकारकडे नसावा, हे शेतकर्‍यांचे दुर्दैव आहे. शेतकऱ्यांप्रती सरकारला कितपत आस्था आहे, याचा हा पुरावा आहे. मी सरकारला सीलिंगच्या जमिनी बद्दल माहिती मागितली होती. त्याबद्दलही हीच अनास्था दिसून आली. खरे तर सरकारची ही अनास्था चिंतेची बाब मानली पाहिजे. सरकार एखादे काम करीत नाही, तेंव्हा विद्यापीठा सारख्या स्वायत्त संस्थांनी पुढे आले पाहिजे. हे काम कोणत्याच विद्यापीठाने आज पर्यंत का केले नाही.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या स्वातंत्र्य पूर्व काळात होत होत्या. नंतरही सातत्याने होत आल्या आहेत. १९६२ ला प्रमाण वाढले म्हणून ‘पीएचडी’ करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास केला. १९८६ साली साहेबराव करपे कुटुंबियांच्या आत्महत्येने सारा महाराष्ट्र हादरला. त्या नंतर न्यायालयाच्या आदेशाने सरकारने शेतकरी आत्महत्याची वेगळी नोंद घ्यायला सुरुवात केली. सुमारे पाच लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या उत्पाताचा सरकारवर परिणाम झाला नाही. पण शेतकरी मात्र जागे झाले. कोण्या नेत्याने सांगितले म्हणून नव्हे तर स्वत: शेतकऱ्यांनी ठरवले की, आपली पुढची पिढी शेतीत ठेवायची नाही. याच काळात खुलीकरण आले व इंडियाचे दार किलकिले झाले. शेतकऱ्यांच्या मुला-मुलींनी फार मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले. त्यामुळे आज ‘शेती हे उत्पन्नाचे मुख्य साधन’ असलेली कुटुंबे खूप कमी झाली आहेत. हे वास्तव नीट समजावून घेतले पाहिजे.

आत्महत्या करणारी कुटुंबे तीच आहेत, ज्यांचे उत्पन्नाचे मुख्य साधन शेती आहे. हे लक्षात घेऊन माझी सरकारला सूचना आहे की, सरकारने कर्जबेबाकी तर करावीच. त्याच बरोबर सरकारी पगारदार व आयकर दात्यांना दिली जाणारी जी रक्कम शिल्लक राहणार आहे ती त्या कुटुंबांमध्ये वाटावी ज्यांचा शेती हाच उत्पन्नाचा मुख्य आधार आहे. अशी रक्कम वाटल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या टळू शकतील. कर्ज- बेबाकी आणि मदत करून थांबू नका. त्याच्या पुढे जाऊन कमाल शेतजमीन धारणा कायदा आणि आवश्यक वस्तू कायदा हे जीवघेणे कायदेही रद्द करावे लागतील.

(लेखक किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते आहेत.)



Source link

फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीला सुरुवात – पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही!

0
फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीला सुरुवात – पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही!


फलटण (प्रतिनिधी) – फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे अर्ज स्वीकारण्याच्या पहिल्या दिवशीची पाटी कोरीच राहिली आहे.

यावर्षी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे. नगरपरिषद कार्यालयात अर्जांची ऑफलाईन विक्री बंद करण्यात आली असून इच्छूक उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज भरावे लागणार आहेत.

निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निखील जाधव यांनी सांगितले. त्यांनी माहिती दिली की, पहिल्या दिवशी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही.

राजकीय पक्षांकडून अद्याप अधिकृत उमेदवारांच्या याद्या जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे इच्छूक उमेदवार पक्षाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. एकदा याद्या जाहीर झाल्या की अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

निवडणूक आयोगाने अर्ज भरण्यासाठी पुरेसा कालावधी दिला असला तरी शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी उमेदवारांनी वेळेत अर्ज भरावेत, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे सूचित करण्यात आले आहे.

आगामी काही दिवसांत फलटणमधील निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता असून राजकीय हालचालींना वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

हाडांमध्ये कट-कट असा आवाज येतोय, कॅल्शियमची कमतरता हे एकच कारण नाही, 5 लक्षणे देखील ठरतात महत्त्वाची

0
हाडांमध्ये कट-कट असा आवाज येतोय, कॅल्शियमची कमतरता हे एकच कारण नाही, 5 लक्षणे देखील ठरतात महत्त्वाची


Symptoms of Calcium Deficiency in Bones:लहानपणापासूनच आपल्याला शिकवले जाते की आपले शरीर हाडांपासून बनलेले आहे. ही हाडे शरीराला आकार, ताकद आणि आधार देतात आणि मेंदूचे रक्षण करणारी कवटी आणि हृदय आणि फुफ्फुसांचे रक्षण करणाऱ्या बरगड्या यासारख्या अनेक महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण करतात. म्हणून, मजबूत हाडे आवश्यक आहेत आणि पुरेसे कॅल्शियम असणे आवश्यक आहे. जर शरीरात कॅल्शियमची पातळी कमी झाली तर त्याचे परिणाम प्रथम हाडांवर आणि नंतर तुमच्या जीवनशैलीवर जाणवतात. कमकुवत हाडे तुमच्या संपूर्ण शरीराच्या रचनेवर परिणाम करतात. म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला पाच प्रमुख लक्षणांबद्दल सांगत आहोत जे तुमच्या हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता दर्शवितात.

Add Zee News as a Preferred Source

हाडे आणि सांधेदुखी
कॅल्शियमच्या कमतरतेचे सर्वात प्रमुख लक्षण म्हणजे हाडे आणि सांधेदुखी. सुरुवातीला ही वेदना अनेकदा सौम्य असते, परंतु नंतर हळूहळू वाढते. जर कॅल्शियमची कमतरता दीर्घकाळ राहिली तर ऑस्टियोपेनिया किंवा ऑस्टियोपोरोसिससारखे आजार होऊ शकतात. हे देखील वाचा – न्यूमोनिया मुलांवर वेगाने परिणाम करत आहे; ते टाळण्यासाठी या ३ लसी घ्या.

पेटके येणे
कॅल्शियमच्या कमतरतेचे आणखी एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे स्नायू कडक होणे, पेटके येणे किंवा मुंग्या येणे. ही लक्षणे विशेषतः पाय, हात किंवा बोटांमध्ये जाणवतात. रात्रीच्या वेळी हे पेटके कधीकधी अधिक तीव्र होतात, जे दर्शविते की शरीराच्या स्नायूंना पुरेसे कॅल्शियम मिळत नाही.

नखांवर आणि दातांवर परिणाम
जेव्हा शरीरात कॅल्शियमची कमतरता असते तेव्हा तुमचे नखे सहजपणे तुटतात आणि तुमच्या दातांच्या ताकदीवर परिणाम होतो. तुम्हाला दात किडणे, संवेदनशीलता आणि हिरड्या दुखणे यासारखी लक्षणे जाणवू शकतात. या कमतरतेचा लहान मुलांमध्ये दातांच्या विकासावरही परिणाम होतो.

थकवा आणि अशक्तपणा
कॅल्शियम तुमच्या शरीरात ऊर्जा निर्मितीमध्ये भूमिका बजावते. कमतरतेमुळे सतत थकवा, अशक्तपणा किंवा आळस येऊ शकतो, ज्यामुळे दैनंदिन कामांवर परिणाम होतो. ही स्थिती कॅल्शियमच्या कमतरतेचे एक महत्त्वाचे सूचक देखील आहे.

हाडांच्या फ्रॅक्चरचा धोका वाढतो
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे, वयानुसार किंवा त्यापूर्वी, हाडांची घनता कमी होते. यामुळे किरकोळ दुखापत किंवा पडूनही हाडे फ्रॅक्चर होऊ शकतात. ही समस्या वृद्ध लोकांमध्ये अधिक सामान्य आहे. म्हणून, तुम्हाला ही कमतरता दूर करण्याची आणि स्वतःची खूप काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अस्वीकरण: प्रिय वाचकांनो, हा लेख फक्त सामान्य माहिती आणि सल्ला प्रदान करतो. तो कोणत्याही प्रकारे वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. म्हणून, अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञांचा किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.





Source link

साताऱ्यात दोन्ही राजेंचं मनोमिलन, शिवेंद्रराजेंचे संकेत, इच्छुक उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढणार

0



Satara News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या लोकांना बैठका, दौरे सुरु केले आहेत. अशातच सातारा जिल्ह्यात देखील घडामोडींना वेग आला  आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात दोन्ही राजेंचे मनोमिलन झालं आहे. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मनोमिलनावर केले शिक्कामोर्तब केला आहे. भाजपच्या कमळ चिन्हावरच दोन्ही राजेंचे इच्छुक उमेदवार पालिका निवडणूक लढवणार आहेत. 

भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेण्यात आल्या

आज भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेण्यात आल्या. आजच्या मुलाखतीला भाजप आणि दोन्ही राजेंच्या दोन्ही आघाड्या एकत्र दिसल्या. या मुलाखती दरम्यान मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील या मुलाखतीचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांची बोलताना मंत्री शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट दोन्ही राजेंच्या मनोमिलनाबाबत संकेत दिले आहेत. मी आणि उदयनराजे भाजपा म्हणून एकत्र निवडणुका लढणार आहोत. यामध्ये आमच्या दोघांची कुठलीही वेगळी भूमिका नाही असे म्हणत मनोमिलन झाल्याचे स्पष्ट संकेत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले आहेत.

सातारा नगरपालिकेची निवडणूक भाजप आणि दोन्ही राजेंच्या आघाड्या एकत्र लढणार 

एकंदरीत या संपूर्ण पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिका ही निवडणूक भाजप आणि दोन्ही राजेंच्या आघाड्या एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट झाल आहे. आजच्या मुलाखतीनंतर ज्यांनी ज्यांनी मुलाखती दिल्या आहेत त्यांची यादी मुंबईला जाऊन मुख्यमंत्री यांच्यासोबत जिल्ह्याची बैठक घेऊन यादी समोर मांडणार आहे. नेमकं भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री हे नगराध्यक्ष पद आणि, नगरसेवक पदाबाबतची यादी फायनल करतील, असं मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मलाही नगराध्यक्ष व्हायची इच्छा होती, उदयनराजे भोसलेंचं वक्तव्य

स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी होणार की मैत्रीपुर्ण लढत होणार याची चर्चा सुरू असताना खासदार उदयनराजे भोसले यांनी धक्कादायक विधान केले होते. मलाही नगराध्यक्ष व्हायची इच्छा होती त्यामुळे खासदारकीचा राजीनामा देतो, मला नगराध्यक्ष व्हायचं आहे असं वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु होती. त्यामुळं साताऱ्यात मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार की वेगळ्या? अशी चर्चा सुरु होती. मात्र, आज मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दोघांचे मनोमिलन झाल्याचे संकेत दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

शंभूराज देसाई म्हणाले युतीबाबत भाजपकडून निमंत्रण नाही, शिवेंद्रराजे म्हणाले पाटणमध्ये जे होईल तेच मेढ्यामध्ये होईल

आणखी वाचा



Source link