भारतीय सांस्कृतिक जडण घडणीत ज्या शैलगृहांचे संघारामांचे खूप मोठे योगदान आहे त्या पैकीची एक मुख्य लेणी “पितांगलय” म्हणजेच औरंगाबाद जिल्ह्य़ातील कन्नड तालुक्यातील कालीमठ फाट्या जवळील #अरूणा या मौसमी नदीच्या तीरावर विभागून असलेली #पितळखोरा लेणी.
आद्य लेणीचे मान तर या शैलगृहाने पटकावलेले आहेच शिवाय इतरत्र आढळून न येणारी अनेक शिल्पे या शैलगृहाची शोभा वाढवत होती.
पितळखोरा लेणीला गंधर्व लेणी, यक्ष लेणी, किन्नर लेणी असेही संबोधन विद्वान वर्गात प्रचलित आहे.
अभावानेच असे एखादे शिल्प आपल्या दृष्टीपथास पडेल त्यापैकीच हे एक शिल्प पितळखोरा लेणीवर होते, आज हे शिल्प तिथे नाही भग्नावशेषात रूपांतरित झालेली पितळखोरा लेणी तिच्या शेवटच्या अवस्थेत आहे.
लेणीवरील फसाडाचे अलंकरण करण्यासाठी तिला सुशोभित करण्यासाठीच तत्कालीन मान्यतेनुसार समाज मनावर ज्या गोष्टी अधिराज्य करत होत्या जनमानसांना आकृष्ट करत होत्या त्यांचेच अंकन अलंकरण करण्यात येत असे.
हवेतून उडत येणारे गंधर्वाचे हे एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प इतर कोणत्याच लेणीत पाहायला मिळत नाही.
शिल्पाचे सुक्ष्म निरिक्षण केल्या अंती बर्याच गोष्टी साफ दिसून येतात त्यास्तव गढूळ पाण्याखालचे आपल्याला काही दिसत तसेच काहीसे आपले होऊन जाते नितळ पाण्याच्या तळाशी काय दडले आहे हे आपल्या चक्षूना सहज दिसून येते तशीच शिल्पांची भाषा अवगत झाली की बर्याच गोष्टी आपल्याला लक्षात येतात. जसे हवेतून उडत येत असल्याने पक्षा प्रमाणे हे गंधर्व आपले पाय दुमडून स्वर्गातून स्वच्छंदी विहार करत येत आहेत अशी कल्पनाच इथे अधोरेखित करण्यात आली आहे. स्वर्गातून विहार करत करत येत असल्याने आपल्या संरक्षणार्थ त्याने ढाल देखील धरली आहे, आता इथे आणखीन एक बाब साफ स्पष्ट होते ती म्हणजे भारतीय शस्त्रा अशा आयताकृती आकारची ढाल अढळून येत नाही म्हणजेच याचाच अर्थ असा निघतो की ही ढाल पाश्चिमात्य देशातील असून अशा प्रकाराच्या ढाली वापरण्याचे प्रचलन तिकडे होते.
ढालीचे अंकन हे स्पष्ट करते की ऐतदेशी कलाकारांनी एकतर ती पाहीली असणार किंवा शिल्प कोरणारे शिल्पी हे पाश्चिमात्य असणार दोघांच्यापैकी एक बाब पक्की होते.
शिल्पातील गंधर्वाचा पेहराव तत्कालीन जनमानसे लेवून असायचे त्या प्रमाणेच आहे तीच बाब आभूषणांच्या बाबत आहे गळ्यातील कंठा आपल्याला त्याची खुणगाठ पटवून देतो, त्या प्रमाणेच विशेष म्हणजे कुरळे केसांचा हा गंधर्व आजही आपल्याकडे पाहत आपल्या स्वागतासाठी स्वर्गातून विहार करत आपल्यासाठी प्रत्यक्ष हजर होत असल्याचे भाव त्याच्या चेहर्यावर स्पष्टपणे दिसून येत आहेत या आणि अशा अनेक बाबी शिल्पांची भाषा अवगत झाली की कळुन येतात अन्यथा “काला अक्षर भैंस बराबर” अशी आपली अवस्था.
पितळखोरा लेणी यासाठीच महत्त्वपूर्ण आहे !
सूरज रतन जगताप