
Olympics 2036: भारतीय ऑलिम्पिक संघटना म्हणजेच आयओएने २०३६ मध्ये ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर भारताने २०३६ मध्ये ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्याच्या दिशेने पहिले मोठे पाऊल उचलत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती म्हणजेच आयओसीला पत्र पाठवले आहे. क्रीडा मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पत्र १ ऑक्टोबर रोजी पाठवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०३६ च्या ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची इच्छा व्यक्त केली होती.






