
बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, अहमदनगरमधून निलेश लंके, दिंडोरीमधून भास्कर भगरे आणि भिवंडीतून बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर वर्धा लोकसभेच्या उमेदवाराबाबत देखील निर्णय होण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाने माढा, बीड, रावेर, सातारा, वर्धा, लोकसभेचा उमेदवार अद्याप ठरवलेला नाही.








