
येड्याच्या सरकारकडून अपेक्षाभंग
एकनाथ शिंदे (E), देवेंद्र फडणवीस (D) आणि अजित पवार (A) यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ‘येड्या’चं (EDA) सरकार अशी उपमा पटोले यांनी दिली. या सरकारनंही जनतेचा अपेक्षाभंग केला आहे. शेतकरी लुटला जात आहेत, शेतमालाला भाव नाही, पीक येताच बाजारात भाव पाडले जातात. यामुळं लोक भाजपला कंटाळले आहेत, असा दावा पटोले यांनी केला.






