
नाशिक : गणेश विसर्जन मिरवणुकी मोठ्या उत्साहात सुरू असताना राज्यातील अनेक ठिकाणी या उत्सवाला गालबोट लागल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबईत वीज पडून एकाचा मृत्यू, रायगडमध्ये चार जण वाहून गेले, रत्नागिरीत अनियंत्रित टेम्पो मिरवणुकीत घुसून दोघांचा मृत्यू या घटनानंतर आता नाशिक जिल्ह्यातही दुर्घटना घडल्या आहेत. नाशिकमध्ये तीन वेगवेगळ्या घटनेत पाच तरुण बुडाले आहेत.




