
Nashik News: अंधेरीचा राजाच्या विसर्जनदरम्यान बोट कोसळून अनेकजण पाण्यात बुडल्याची घटना रविवारी (२२ सप्टेंबर २०२४) घडली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली. या घटनेला काहीच तास उलटले तोच, नाशिक येथून धक्कादायक माहिती समोर आली. शेत तळ्यात खेकडे पकडायला गेलेल्या दोन मुलांना पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी अंबड-सातपूर लिंक रोडवर असलेल्या संजीवनगरमध्ये घडली. या घटनेने परिसरात खळबळ माजली.