
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या लाटेत महाविकास आघाडीचा पार धुव्वा उडाला. महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सर्वात मोठा फटका बसला.काँग्रेसने १०१ जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांचे अवघे १६ उमेदवार विजय़ी झाले.या दारुण पराभवानंतर काँग्रेस अंतर्गत वादाचे फटाके फुटू लागले आहेत. आता काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. यानंतर आता काँग्रेसमधूनच पटोले यांना उघडपणे विरोध होऊ लागला आहे.