
दरम्यान, गेल्या दोन दिवसांत झालेल्या या घटणांमुळे राज्याची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. त्यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे. या पूर्वी असाच प्रकार मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात घडला होता. यानंतर नांदेड, औरंगाबाद येथे रुग्णांना जीव गमवावा लागल्याने राज्याच्या आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थिती केले जात आहे.






