
Nagpur accident : राज्यातील महानगरात अपघातांची संख्या वाढली आहे. पुणे, मुंबई येथील अपघाताच्या घटना ताज्या असतांना राज्याची उपराजधानीत देखील गेल्या ४८ तासात झालेल्या विविध अपघात ६ जणांनी जीव गमावला आहे. मंगळवारी पहाटे ३ च्या सुमारास कोराडी पांजरा परिसरात कारमध्ये रील तयार करण्याच्या नादात कार वरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकला धडकुन दोन तरुण ठार तर तिघे जखमी झाले आहेत.